“गूळ” किंवा “ज्यागरी” हे एक पारंपारिक गोड आहे जे भारतीय सर्रास आपल्या जेवणात वापरतात. गूळ हा एक खरोखर चांगला “रिफाइन साखरेला” पर्याय आहे आणि त्यामुळे बरेचसे आहार तज्ञ साध्या साखरेच्या एवजी गूळ वापरायला सांगतात.
गूळ हे साखरे एवढे जास्त शुद्ध (refined) केले नसल्याने त्यात बरेच जीवनसत्व आणि खनिजे असतात.
तर मग आपल्याला प्रश्न पडेल की अस असेल तर मधुमेह रुग्णांनी का गूळ खाऊ नये.
या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला गूळ कसा बनतो हे लक्षात घ्यावे लागेल.
गूळ हा उसापासून किंवा खजुरा पासुन बनवतात.
हे बनविताना उसाचा रस किंवा खजुराचा रस हा पारंपारिक पद्धतिने एका मोठ्या आणि लहान भांड्यात उकळला जातो. अख्खी प्रक्रिया झाल्यावर राहिलेले जो अवशिष्ट भाग आहे तो पोषक तत्व आणि लोह सारख्या खनिजं यांनी साखरेच्या तुलनेत फारच समृद्ध असतो. आपल्याकडे मिळणारा गूळ हा प्रामुख्याने उसाचा असतो. आता जरी ह्यात पोषक तत्व आणि लोह यांचे प्रमाण जास्त असल तरी सरल साखरेची मात्रा (simple sugars) पण खूपच जास्त असते.
गूळ खाणे तसे बरेच फायद्याचे आहे कारण रक्तदाब नियंत्रण (लोह असल्याने), अपचनाचा त्रास किंवा ऑक्सिडेटिंव ताण कमी करण्यात चांगली मदत होते. त्यामुळे आपले वडीलधारी नेहमी जेवणानंतर गुळ खायला सांगतात. पण मधुमेह रूग्णांना चांगले अन्न म्हणजे ज्यांची ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index) कमी आहे की ज्यांनी जेवणानंतर रक्ताची साखरेची पातळी जास्त वाढणार नाही असे खाणे.
गुळाची “ग्लायसेमिक इंडेक्स” ही खूपच जास्त आहे त्यामूळे ते मधुमेह रुग्णांनी खाणे योग्य नाही. सामान्यतः सुद्धा मधुमेहीनी गोड आणि मिष्टान्न खाणे टाळणे ज्यांची डायबिटीस पातळी नियंत्रणात नाही अशांनी गरजेचे आहे.
निष्कर्ष – जर तुम्ही निरोगी आहात आणि तुम्हाला मधुमेह नसेल तर तुम्ही पांढर्या साखरे ऐवजी गुळ खाऊ शकता पण जर तुम्हाला मधुमेह असेल तर मात्र गुळ पासून लांबच राहिलेले चांगले.
माझी लिहिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास ती नक्की तुमच्या मित्र परिवारांसोबत whatsapp आणि फेसबुकवर शेअर करा.
धन्यवाद
जय हिंद जय महाराष्ट्र