माझ्या मता नुसार मधुमेह किंवा डायबिटीस असणार्या व्यक्तीने चपाती खाणे योग्य आहे.
ते का योग्य आहे हे मी आपणास समजावण्याचा प्रयत्न करतो.
येथे आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागेल जो भारतीय संस्कृती वर आधारित आहे.
भारतातील बहुतांश लोक म्हणजे अगदी 99% लोक कार्बोहाइड्रेट (carbohydrates) भरपूर प्रमाणात खातात. तो आपल्या आहाराचा अविभाज्य घटक आहे.
छायाचित्र – विकिपीडिया
भारतात बहुतांश लोकांचा आहार जवळपास 75-80% हा कार्बोहायडेट्स (carbohydrates) वर आहे. यात सरल कार्बोहाइड्रेट (simple carbs) अणि जटिल कार्बोहाइड्रेट (complex carbs) हे दोन्ही येतात.
म्हणजे यात चपाती भाकरी भात हे सर्व आल.
जेव्हां आपण म्हणतो की ज्वारी बाजरी भाकरी खातो ते पण आले.
मधुमेह असलेल्या व्यक्तीने हे कार्बोहाइड्रेट चे प्रमाण आहारात कमी करणे गरजेचे आहे. पण भारतीय आहारात काही केल्या हे प्रमाण कमी करणे शक्य नाही.
त्यामुळे आपण हे प्रमाण कमी करून ते 50-55% आणणे गरजेचे आहे. कारण आपल्या आहारात ते त्याहून कमी करणे जवळपास अशक्य आहे.
अणि जरी एखाद्याने म्हंटले की मी कमी करतो तरी ते 4–6 महिने तो करेल पण आयुष्यभर करणे शक्य नाही. हे मी सामान्य जनतेला (जनरल पब्लिक) यांना अनुसरून म्हणतोय. (फिल्मस्टार किंवा सेलिब्रिटी त्यात येत नाही – ते लाख रुपये देऊन पर्सनल आहार तदन्य dietitian ठेवू शकतात). पण जो व्यक्ती 9 ते 5 ड्यूटी करून घरी येतो त्याला हे शक्य नाही.
माझे पेशंट हे सामान्य माणूस (common man) असतात त्यामुळे मला असे भलते सलते सल्ले देता येत नाही. कारण मला त्यांचा मधुमेह त्यांची रोजी रोटी सांभाळून नियंत्रणात ठेवावा लागतो.
Gluten बदल मी नंतर सविस्तर चर्चा करेन पण माझ अस प्रामाणिक मत आहे की नॉर्मल सामान्य (कॉमन) माणसाने असल्या भानगडीत पडू नये आणि आपल्या नेहमीच्या आयुष्यात कसा आणि किती बदल (lifestyle modification) आणता येईल की जेणेकरून वजन कमी होईल यावर भर द्यावा.
मधुमेह रुग्णांनी प्रामुख्याने स्वताचे लक्ष्य हे सकस आहार आणि नियमित व्यायाम करून वजन कमी करण्यावर द्यावे. आहारात काय गोष्टी घ्याव्यात यासाठी तुम्ही माझा हा वीडियो पाहू शकता.
विडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि चॅनल ला subscribe करा.
धन्यवाद
जय हिंद जय महाराष्ट्र
डॉ निखिल प्रभु