मधुमेह हा एक वाढत जाणारा आजार आहे की ज्यात शरीरात इन्सुलिन बनण्याचे प्रमाण कमी होत जाते सोबत इन्सुलिन काम करणे ही कमी करते आणि त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. यालाच “डायबिटीज” असेही म्हणतात.
याचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत.
- टाइप 1 मधुमेह – ह्या प्रकारात शरीरात इन्सुलिन बनण्याचे प्रमाण शून्य होते म्हणजे इन्सुलिन बनणे पूर्णतः बंद होते आणि अशा रोग्यांना आयुष्यभर इन्सुलिन बाहेरून इंजेक्शन स्वरुपात घ्यावे लागते. हा प्रकार साधारणतः सुमारे 5-10% लोकांमध्ये पाहावयास मिळतो. 1920 साली जेव्हा ‘बॅटींग आणि बेस्ट’ यांनी इन्सुलिन चा शोध लावला त्या आधी हा आजार 100% जीवघेणा होता.
- टाइप 2 मधुमेह – हा प्रकार साधारणतः जवळपास 90-95% लोकांमध्ये आढळून येतो. या प्रकारात इन्सुलिन बनणे आणि इन्सुलिन ने काम करणे ह्या दोन्ही गोष्टी कमी झालेल्या असतात. जेव्हा आपण मधुमेह म्हणतो तेव्हा आपण नकळत टाइप 2 मधुमेहाचा उल्लेख करत असतो कारण तो जास्त सामन्य आहे.
मधुमेह नीट समजून घेण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी नीट समजून घेणे आवश्यक आहे.
आपल्या शरीरात दोन प्रकारची संप्रेरक आहेत जी रक्तातील साखरेचे नियंत्रण करतात. ती म्हणजे “इन्सुलिन“(insulin) आणि “ग्लक्यागौन“(glucagon). ह्या दोन संप्रेरक यांच्या रक्तातील मात्रेने रक्तातील साखरेचे नियंत्रण केले जाते.
इन्सुलिन संप्रेरक रक्तातील साखर स्नायू आणि चरबी यात जमा करून ठेवते याशिवाय यकृता मध्ये glycogen (साखरेचा स्टोरेज वाला फॉर्म) बनवते. या सर्व कृत्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. आता समजा काही कारणास्तव हे इन्सुलिन बनणे कमी झाले तर रक्तातील साखरेचे वाटप कमी होते आणि रक्तात साखरेचे प्रमाण वाढू लागते यालाच आपण मधुमेह म्हणतो.
इन्सुलिन हे संप्रेरक पनक्रियाज (pancreas) या अवयव यातील “बेटा सेल्स ऑफ लंगरहंस ” नामक पेशींच्या समूहाकडे बनवले जाते आणि पुढे रक्तात सोडले जाते.
इन्सुलिन ने काम कमी करणे किंवा निकृष्ट दर्जाचे इन्सुलिन बनणे (Insulin resistance) ह्याचे प्रमुख कारण म्हणजे पोटा वरील चरबी (visceral fat). वजन कमी केल्याने ह्यात लक्षणीय बदल होऊन इन्सुलिन रेजिस्टाअंश बर्या पैकी कमी होतो आणि मधुमेह नियंत्रण चांगले होते.
आता जाणून घेऊया की याची लक्षणे कोणती?
सर्वप्रथम आपण लक्षात घेतले पाहिजे की प्रत्येक मधुमेहाचा रुग्णाला सर्व लक्षणे दिसलीच पाहिजे असे नाही. ती कमी जास्त प्रमाणात दिसू शकतात कधी कधी तर अजिबात दिसत सुद्धा नाहीत म्हणुनच रक्तातील साखरेची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
काही वेळा तर जो पर्यंत रक्तातील साखरेचे प्रमाण खूपच उंचावले जात नाही तोपर्यंत लक्षणे दिसून येत नाहीत.
चला पाहूया तर कोणती लक्षणे आहेत ती :-
- खूप तहान लागणे
- खूप भूक लागणे
- खूप वेळा लघवी ला जावे लागणे (मुख्यतः रात्रीच्या वेळी)
ही तीन मुख्य लक्षणे आहेत पण ती दिसायला कधीकधी बराच काळ लागतो किंवा रक्तातील साखरेचे प्रमाण खूपच वाढावे लागते. आता त्यापुढे
- वजन नकळत कमी होणे
- कमजोरी किंवा अशक्तपणा
- सांधे दुखी
- अंग दुखी
- पायाला मुंग्यां, जळजळ, आग आग, सुन्न पणा
- अंधुक किंवा धुरकट दिसणे
- एकाग्रता कमी होणे
- सारखा थकवा जाणवणे
- त्वचा कोरडी होणे खाज येणे
- जखमा बर्या होण्यास जास्त वेळ लागणे
- लघवी ला जळजळ होणे लघवी लालसर होणे
या लेखातून मी मधुमेहा विषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला तो आवडला असल्यास हा लेख नक्की तुमच्या दोस्त परिवार सोबत्यांना शेअर करा.
धन्यवाद
जय हिंद जय महाराष्ट्र