ज्या व्यक्तीला मधुमेह आहे त्या व्यक्तीने गुळ खाणं कितपत योग्य आहे?

“गूळ” किंवा “ज्यागरी” हे एक पारंपारिक गोड आहे जे भारतीय सर्रास आपल्या जेवणात वापरतात. गूळ हा एक खरोखर चांगला “रिफाइन साखरेला” पर्याय आहे आणि त्यामुळे बरेचसे आहार तज्ञ साध्या साखरेच्या एवजी गूळ वापरायला सांगतात.

गूळ हे साखरे एवढे जास्त शुद्ध (refined) केले नसल्याने त्यात बरेच जीवनसत्व आणि खनिजे असतात.

तर मग आपल्याला प्रश्न पडेल की अस असेल तर मधुमेह रुग्णांनी का गूळ खाऊ नये.

या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला गूळ कसा बनतो हे लक्षात घ्यावे लागेल.

गूळ हा उसापासून किंवा खजुरा पासुन बनवतात.

हे बनविताना उसाचा रस किंवा खजुराचा रस हा पारंपारिक पद्धतिने एका मोठ्या आणि लहान भांड्यात उकळला जातो. अख्खी प्रक्रिया झाल्यावर राहिलेले जो अवशिष्ट भाग आहे तो पोषक तत्व आणि लोह सारख्या खनिजं यांनी साखरेच्या तुलनेत फारच समृद्ध असतो. आपल्याकडे मिळणारा गूळ हा प्रामुख्याने उसाचा असतो. आता जरी ह्यात पोषक तत्व आणि लोह यांचे प्रमाण जास्त असल तरी सरल साखरेची मात्रा (simple sugars) पण खूपच जास्त असते.

गूळ खाणे तसे बरेच फायद्याचे आहे कारण रक्तदाब नियंत्रण (लोह असल्याने), अपचनाचा त्रास किंवा ऑक्सिडेटिंव ताण कमी करण्यात चांगली मदत होते. त्यामुळे आपले वडीलधारी नेहमी जेवणानंतर गुळ खायला सांगतात. पण मधुमेह रूग्णांना चांगले अन्न म्हणजे ज्यांची ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index) कमी आहे की ज्यांनी जेवणानंतर रक्ताची साखरेची पातळी जास्त वाढणार नाही असे खाणे.

गुळाची “ग्लायसेमिक इंडेक्स” ही खूपच जास्त आहे त्यामूळे ते मधुमेह रुग्णांनी खाणे योग्य नाही. सामान्यतः सुद्धा मधुमेहीनी गोड आणि मिष्टान्न खाणे टाळणे ज्यांची डायबिटीस पातळी नियंत्रणात नाही अशांनी गरजेचे आहे.

निष्कर्ष – जर तुम्ही निरोगी आहात आणि तुम्हाला मधुमेह नसेल तर तुम्ही पांढर्‍या साखरे ऐवजी गुळ खाऊ शकता पण जर तुम्हाला मधुमेह असेल तर मात्र गुळ पासून लांबच राहिलेले चांगले.

माझी लिहिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास ती नक्की तुमच्या मित्र परिवारांसोबत whatsapp आणि फेसबुकवर शेअर करा.

धन्यवाद

जय हिंद जय महाराष्ट्र

मधुमेह असणारी व्यक्ती रक्तदान करू शकते का?

हो पण आणि नाहीं पण.

जर एखाद्या मधुमेह रुग्णाची रक्ताची साखरेची पातळी नॉर्मल रेंज मध्ये आहे आणि त्याला बाकीचे आजार जसे की रक्तदाब, रक्तातील चरबी (cholesterol) नियंत्रणात असेल आणि कोणत्याही प्रकारचे हृदय विकार नसतील तर अशी व्यक्ति रक्तदान करू शकते मग ती टाइप 1 असो का टाइप 2 मधुमेह.

चांगले मधुमेह नियंत्रण म्हणजे तीन महिन्यांची साखरेची चाचणी (HbA1c <7) सात च्या खाली असणे आवश्यक आहे.

Image credit – janswsmi darpan

आता रक्तदानासाठी काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे.

  • जर टाइप 1 मधुमेह आणि टाइप 2 मधुमेह असणारे ज्यांना इन्सुलिन ट्रीटमेंट चालु आहे त्यांच्या मध्ये जर शुगर नियंत्रण व्यवस्थित नसेल किंवा इन्सुलिन डोस एडजस्ट केले नसतील तर रक्तदान करतेवेळी “लो किंवा शुगर डाऊन” व्हायची शक्यता असते. आणि काही वेळा शुगर डाऊन (Hypoglycemia) होणे फारच रिस्की ठरू शकते.
  • ज्या मधुमेह रुग्णांना हृदय विकार आहे ते रक्तदान करण्यास पात्र नाहीत कारण हे जीवघेणे ठरू शकते.
  • प्री – डायबिटीस असणारे रक्तदान करू शकतात परंतु त्यांना कोणताही हृदय विकाराचा इतिहास नको.
  • सामान्यतः ज्या मधुमेह रुग्णांची औषध मात्रा गेल्या महिन्याभरात एडजस्ट केली आहे किंवा मधुमेह च्या गोळ्या बदलल्या आहेत अशा व्यक्ति मध्ये रक्तदान थोडे रिस्की आहे.
  • याशिवाय काही मोठ्या सर्जरी जशा ट्रांसप्लांट (pancreatic transplant) वगैरे झाल्या असतील तर रिस्क जास्त असते. त्यामुळे शक्यतो रक्तदान करण्यापुर्वी च्या गेल्या 3 महिन्यात कोणतीही मोठी शस्त्रक्रिया झालेली नसावी.
  • या शिवाय बाकी रक्तदानासाठी जे नियम आहेत ते सर्व पालन करणे आवश्यक आहेच.

माझे उत्तर आपणास आवडल्यास ते नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा.

धन्यवाद

मधुमेहाच्या रुग्णाने चपाती खाणे योग्य की अयोग्य?

माझ्या मता नुसार मधुमेह किंवा डायबिटीस असणार्‍या व्यक्तीने चपाती खाणे योग्य आहे.

ते का योग्य आहे हे मी आपणास समजावण्याचा प्रयत्न करतो.

येथे आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागेल जो भारतीय संस्कृती वर आधारित आहे.

भारतातील बहुतांश लोक म्हणजे अगदी 99% लोक कार्बोहाइड्रेट (carbohydrates) भरपूर प्रमाणात खातात. तो आपल्या आहाराचा अविभाज्य घटक आहे.

credits-wikipedia

छायाचित्र – विकिपीडिया

भारतात बहुतांश लोकांचा आहार जवळपास 75-80% हा कार्बोहायडेट्स (carbohydrates) वर आहे. यात सरल कार्बोहाइड्रेट (simple carbs) अणि जटिल कार्बोहाइड्रेट (complex carbs) हे दोन्ही येतात.

म्हणजे यात चपाती भाकरी भात हे सर्व आल.

जेव्हां आपण म्हणतो की ज्वारी बाजरी भाकरी खातो ते पण आले.

मधुमेह असलेल्या व्यक्तीने हे कार्बोहाइड्रेट चे प्रमाण आहारात कमी करणे गरजेचे आहे. पण भारतीय आहारात काही केल्या हे प्रमाण कमी करणे शक्‍य नाही.

त्यामुळे आपण हे प्रमाण कमी करून ते 50-55% आणणे गरजेचे आहे. कारण आपल्या आहारात ते त्याहून कमी करणे जवळपास अशक्य आहे.

अणि जरी एखाद्याने म्हंटले की मी कमी करतो तरी ते 4–6 महिने तो करेल पण आयुष्यभर करणे शक्य नाही. हे मी सामान्य जनतेला (जनरल पब्लिक) यांना अनुसरून म्हणतोय. (फिल्मस्टार किंवा सेलिब्रिटी त्यात येत नाही – ते लाख रुपये देऊन पर्सनल आहार तदन्य dietitian ठेवू शकतात). पण जो व्यक्ती 9 ते 5 ड्यूटी करून घरी येतो त्याला हे शक्य नाही.

माझे पेशंट हे सामान्य माणूस (common man) असतात त्यामुळे मला असे भलते सलते सल्ले देता येत नाही. कारण मला त्यांचा मधुमेह त्यांची रोजी रोटी सांभाळून नियंत्रणात ठेवावा लागतो.

Gluten बदल मी नंतर सविस्तर चर्चा करेन पण माझ अस प्रामाणिक मत आहे की नॉर्मल सामान्य (कॉमन) माणसाने असल्या भानगडीत पडू नये आणि आपल्या नेहमीच्या आयुष्यात कसा आणि किती बदल (lifestyle modification) आणता येईल की जेणेकरून वजन कमी होईल यावर भर द्यावा.

मधुमेह रुग्णांनी प्रामुख्याने स्वताचे लक्ष्य हे सकस आहार आणि नियमित व्यायाम करून वजन कमी करण्यावर द्यावे. आहारात काय गोष्टी घ्याव्यात यासाठी तुम्ही माझा हा वीडियो पाहू शकता.

विडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि चॅनल ला subscribe करा.

धन्यवाद

जय हिंद जय महाराष्ट्र

डॉ निखिल प्रभु

मधुमेह होऊ नये म्हणुन काय काळजी घेतली पाहिजे?

मधुमेह अथवा डायबीटीज जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण टाइप 2 बद्दल बोलत असतो कारण 95% लोकांना टाइप 2 असतो़.

आता टाइप 2 मधुमेह हा मुख्यतः 20 वर्षां पुढील लोकाना सर्व सामान्यपणे असतो. ह्यात इन्सुलिन चे बनण्याचे प्रमाण कमी होते अणि त्याची एक्शन पण कमी होते अस समजा की निकृष्ट दर्जाचे इन्सुलिन बनते.

ह्याला “इन्सुलिन रेसीस्टनस” (insulin resistance) अस म्हणतात अणि हा लठ्ठ माणसांमधे जास्त पाहावयास मिळतो. Visceral किंवा पोटावर ची चरबी हे ह्याच मुख्य कारण आहे.

आता प्रमुख उत्तरावर येतो.

मधुमेह मागे 2 प्रकारचे रिस्क फैक्टर असतात

  • बदलू शकणारे अणि
  • न बदलू शकणारे

बदलू न शकणारे फैक्टर म्हणजे

  1. वाढते वय
  2. पारिवारिक इतिहास किंवा जेनेटिक हिस्टरी
  3. आशियायी जात किंवा एशियन रेस, इत्यादि

जस एशियन लोकाना पोटावर जास्त चरबी असते अमेरीकन लोकांशी तुलना केल्यास हे आपण बदलू शकत नाही. वाढते वय थांबवू शकत नाही शिवाय मधुमेहाचा पारिवारिक इतिहास म्हणजे तुमच्या आई वडील किंवा आजी आजोबा यांना मधुमेह असू शकतो ते काही आपण बदलू शकत नाही.

त्यामुळे मधुमेह टाळण्यासाठी आपण फक्त वातावरण (environmental) किंवा बदलू शकणारे फॅक्टर्स वर लक्ष घेऊया.

आता त्यात पुढील फैक्टर आहेत जे आपण modify किंवा बदलू शकतो.

  1. वजन कमी करणे (पोटावर ची चरबी) – ह्यात सकस आहार अणि नियमित व्यायाम ह्याला विशेष महत्व आहे. व्यायामाने glucose फॅट अणि स्नायू पेशींच्या आत जायला मदत होते. सकस आहाराने सर्व जीवन सत्व मिळतात अणि शुगर लेवल वाढत नाही. मी ह्याच डिटेल्स स्पष्टीकरण नंतर पुढील उत्तरात नक्की देईन.
  2. स्मोकिंग बंद करने – मधुमेह होण्याची रिस्क वाढते धुम्रपान केल्याने
  3. आपले ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब नियंत्रणात ठेवणे
  4. तळलेल्या गोष्टीं एवजी भाजलेल्या किंवा उकडलेल्या गोष्टी खाने
  5. आहारात पिष्टमय पदार्थ कमी करणे (भारतीय आहारात 70-75% carbs घेतात)
  6. प्रोसेस फूड कमी करणे.

एक प्रकारे बारीक राहून आपण मधुमेह पासून वाचू शकतो काही प्रमाणात.

मधुमेह हा एक “मेटबॉलीक सिनेड्रॉम” (metabolic syndrome) चा भाग आहे व त्यात लठ्ठ पणा, (dislipidemia) म्हणजे चरबी चे अनियंत्रण, उच्च रक्तदाब हे सर्व येत.

आज जर मधुमेह च निदान झालाय तर अस समजा की 5 ते 10 वर्षा आधी पासून जे रोप लावलेले त्याचे झाड आता दिसू लागले.

हळू हळू वजन वाढलं मग पोट पुढे आल मग रक्तदाब मग चरबी (cholesterol) मग मधुमेह.

म्हणजे जर ह्या पासुन जर वाचायचे आहे तर हे सर्व नियंत्रणात ठेवण महत्त्वाचे.

जय महाराष्ट्र

डॉ निखिल प्रभु

मधुमेह म्हणजे नेमक काय? त्याची लक्षणे कोणती? आणि किती प्रकार आहेत?

मधुमेह हा एक वाढत जाणारा आजार आहे की ज्यात शरीरात इन्सुलिन बनण्याचे प्रमाण कमी होत जाते सोबत इन्सुलिन काम करणे ही कमी करते आणि त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. यालाच “डायबिटीज” असेही म्हणतात.

याचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत.

  1. टाइप 1 मधुमेह – ह्या प्रकारात शरीरात इन्सुलिन बनण्याचे प्रमाण शून्य होते म्हणजे इन्सुलिन बनणे पूर्णतः बंद होते आणि अशा रोग्यांना आयुष्यभर इन्सुलिन बाहेरून इंजेक्शन स्वरुपात घ्यावे लागते. हा प्रकार साधारणतः सुमारे 5-10% लोकांमध्ये पाहावयास मिळतो. 1920 साली जेव्हा ‘बॅटींग आणि बेस्ट’ यांनी इन्सुलिन चा शोध लावला त्या आधी हा आजार 100% जीवघेणा होता.
  2. टाइप 2 मधुमेह – हा प्रकार साधारणतः जवळपास 90-95% लोकांमध्ये आढळून येतो. या प्रकारात इन्सुलिन बनणे आणि इन्सुलिन ने काम करणे ह्या दोन्ही गोष्टी कमी झालेल्या असतात. जेव्हा आपण मधुमेह म्हणतो तेव्हा आपण नकळत टाइप 2 मधुमेहाचा उल्लेख करत असतो कारण तो जास्त सामन्य आहे.

मधुमेह नीट समजून घेण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी नीट समजून घेणे आवश्यक आहे.

आपल्या शरीरात दोन प्रकारची संप्रेरक आहेत जी रक्तातील साखरेचे नियंत्रण करतात. ती म्हणजे “इन्सुलिन“(insulin) आणि “ग्लक्यागौन“(glucagon). ह्या दोन संप्रेरक यांच्या रक्तातील मात्रेने रक्तातील साखरेचे नियंत्रण केले जाते.

इन्सुलिन संप्रेरक रक्तातील साखर स्नायू आणि चरबी यात जमा करून ठेवते याशिवाय यकृता मध्ये glycogen (साखरेचा स्टोरेज वाला फॉर्म) बनवते. या सर्व कृत्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. आता समजा काही कारणास्तव हे इन्सुलिन बनणे कमी झाले तर रक्तातील साखरेचे वाटप कमी होते आणि रक्तात साखरेचे प्रमाण वाढू लागते यालाच आपण मधुमेह म्हणतो.

इन्सुलिन हे संप्रेरक पनक्रियाज (pancreas) या अवयव यातील “बेटा सेल्स ऑफ लंगरहंस ” नामक पेशींच्या समूहाकडे बनवले जाते आणि पुढे रक्तात सोडले जाते.

इन्सुलिन ने काम कमी करणे किंवा निकृष्ट दर्जाचे इन्सुलिन बनणे (Insulin resistance) ह्याचे प्रमुख कारण म्हणजे पोटा वरील चरबी (visceral fat). वजन कमी केल्याने ह्यात लक्षणीय बदल होऊन इन्सुलिन रेजिस्टाअंश बर्‍या पैकी कमी होतो आणि मधुमेह नियंत्रण चांगले होते.

आता जाणून घेऊया की याची लक्षणे कोणती?

सर्वप्रथम आपण लक्षात घेतले पाहिजे की प्रत्येक मधुमेहाचा रुग्णाला सर्व लक्षणे दिसलीच पाहिजे असे नाही. ती कमी जास्त प्रमाणात दिसू शकतात कधी कधी तर अजिबात दिसत सुद्धा नाहीत म्हणुनच रक्तातील साखरेची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे.

काही वेळा तर जो पर्यंत रक्तातील साखरेचे प्रमाण खूपच उंचावले जात नाही तोपर्यंत लक्षणे दिसून येत नाहीत.

चला पाहूया तर कोणती लक्षणे आहेत ती :-

  • खूप तहान लागणे
  • खूप भूक लागणे
  • खूप वेळा लघवी ला जावे लागणे (मुख्यतः रात्रीच्या वेळी)

ही तीन मुख्य लक्षणे आहेत पण ती दिसायला कधीकधी बराच काळ लागतो किंवा रक्तातील साखरेचे प्रमाण खूपच वाढावे लागते. आता त्यापुढे

  • वजन नकळत कमी होणे
  • कमजोरी किंवा अशक्तपणा
  • सांधे दुखी
  • अंग दुखी
  • पायाला मुंग्यां, जळजळ, आग आग, सुन्न पणा
  • अंधुक किंवा धुरकट दिसणे
  • एकाग्रता कमी होणे
  • सारखा थकवा जाणवणे
  • त्वचा कोरडी होणे खाज येणे
  • जखमा बर्‍या होण्यास जास्त वेळ लागणे
  • लघवी ला जळजळ होणे लघवी लालसर होणे

या लेखातून मी मधुमेहा विषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला तो आवडला असल्यास हा लेख नक्की तुमच्या दोस्त परिवार सोबत्यांना शेअर करा.

धन्यवाद

जय हिंद जय महाराष्ट्र

मधुमेह येणे आयुष्यभर कसे टाळावा?

मधुमेह हा एक वागणूक संबंधात असणारा आजार आहे. त्यामुळे तो टाळण्यासाठी आपल्याला मुळात वागणुक किंवा आचार सारणी बदलणे महत्त्वाचे आहे.यालाच आपण “लाइफ स्टाइल मोडिफाइड” करण असे म्हणतो.

 

 

पण हे झाले घटक जे आपण बदलू शकतो. याशिवाय काही घटक असे असतात की जे आपण बदलू शकत नाही उदाहरणार्थ वाढत वय, आशियाई रेस, पारिवारिक मधुमेहाचा इतिहास, इत्यादि.त्यामुळे आपण जे घटक बदलू शकतो त्यावर लक्ष्य देऊया.आता त्यात प्रामुख्याने खाली नमूद केलेल्या बाबींचा समावेश होतो.

  1. आपल्या आहारातून साखर आणि सरल कार्बोहाइड्रेट कमी करावे.
  2. नियमितपणे व्यायाम करावा. म्हणजे बराच वेळ एकाच ठिकाणी बसून राहू नये. निदान दिवसात 40 मिनिटे तरी चालावे.
  3. आपला प्राथमिक पेय म्हणून पाणी किंवा ताक प्यावे. याशिवाय उन्हाळ्यात शक्यतो भरपूर पाणी प्यावे.
  4. वजन जास्त असल्यास किंवा लठ्ठपणा असल्यास वजन कमी करावे.
  5. धूम्रपान करू नये. दारू चे प्राशन कमी करावे.
  6. तळलेल्या गोष्टी टाळावे आणि भाजलेले किंवा उकडलेले अन्नपदार्थ आहारात समावेश करावेत.
  7. उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवावे. रक्तदाबाचा गोळ्या वेळे वर घ्याव्यात. विसरू नये.
  8. जर तुमचं वय वर्षे चाळिशीच्या पुढे असेल तर निदान सहा महिन्यातून एकदा शुगर तपासणी नक्की करावी. म्हणजे बॉर्डर लाइन प्री – डायबिटीज निघाल्यास वजन कमी करून वाढ थांबवू शकतो.
  9. जर तुमच्या घरातील कोणाला मधुमेह असल्यास तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका संभवतो, अशावेळी नियमित तपासणी, व्यायाम, सकस आहार आणि वजन कमी करण्यावर जरा जास्त लक्ष द्या.
  10. कोलेस्टेरॉल वाढणे, रक्तदाब वाढणे, वजन वाढणे हे देखील “मेटबोलीक सीनड्रम ” चा भाग आहे त्यामूळे ते नियंत्रणात ठेवून स्वतः ‘सडपातळ’ राहणे हाच मधुमेह पासून वाचण्याचा उपाय आहे.

धन्यवाद🙏

मधुमेह असणार्‍या रुग्णांमध्ये HbA1c या तपासणीचे महत्व किती आहे

HbA1c किंवा glycosylated हीमोग्लोबिन ही एक रक्ताची चाचणी आहे की जी आपल्या मागील तीन महिन्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण दाखवते.

ही खाण्याच्या पदार्थाने किंवा मात्रेने बदलत नाही त्यामुळे साखरेची रक्तातील मात्रा मागच्या तीन महिन्याची अचूक समजण्यास मदत होते. आणि ही चाचणी फार भरोसेमंद आहे.

Image credit – Diabetes UK

मी उदाहरण देऊन समजावण्याचा प्रयत्न करतो.

एखादा मधुमेह रुग्ण जेव्हा जेवण करून दोन तासानी रक्त देऊन मधुमेहा ची तपासणी (PPBS) करतो तेव्हा येणारा रिपोर्ट हा त्या जेवणातील पदार्थ (म्हणजे भात खाल्ला का चपाती) अणि त्याची मात्रा (म्हणजे 4 पोळ्या खाल्ल्या का 6) या वर अवलंबून असतो.

कमी खाऊन टेस्ट केली तर कमी रिपोर्ट जास्त खाऊन केल तर जास्त रीपोर्ट.

रिकाम्या पोटी (fasting) रिपोर्ट चाही तसच असत थोड फार (जास्त लिवर आणि किडनी क्षमता) म्हणजे आदल्या रात्री भात खाला असेल तर जास्त किंवा fasting 8 तास केली का 12 तास यावर पण फरक पडतो रीपोर्ट वर.

पण HbA1c चे तसे नाही कारण हा खाण्याने बदलत नाही त्यामूळे तो जास्त reliable किंवा भरोसेमंद आहे.

याचा प्रॅक्टिस मध्ये कसा उपयोग होतो ते सांगतो.

पाहिले म्हणजे मधुमेहाच निदान करणे.

एखाद्या व्यक्तीचा रक्ताचा HbA1c रीपोर्ट 6.5 किंवा त्याहून जास्त असेल तर त्याला मधुमेह आहे हे निश्चित होते.

5.8 ते 6.4 ला प्री – डायबिटीज (Pre-diabetes) अस म्हणतात म्हणजे बॉर्डर वर (ही reversible स्टेज आहे).

5.7 पेक्षा कमी म्हणजे मधुमेह नाही.

मधुमेह रुग्ण चांगलं नियंत्रण पाळतो आहे की नाही यावर लक्ष्य ठेवणे

मधुमेह रुग्णाचे HbA1c जर 6.5 ते 7% च्या दरम्यान असेल तर त्याचे चांगले नियंत्रण आहे. जर जास्त असेल तर गोळ्या वाढवण्याची गरज आहे.

आता आलोपाठी (allopathy) मधील मधुमेह च्या गोळ्यांना सुद्धा ठराविक HbA1c कमी करण्याची क्षमता असते. त्यामुळे कोणती गोळी कोणाला कधी वापरावी याची पण डॉक्टराना कल्पना येते.

HbA1c चाचणीच्या काही त्रुटी सुद्धा आहेत.

थोडक्यात सांगतो.

गेल्या 3 महिन्यात काहीही कारणाने जास्त रक्तस्त्राव झाला (सर्जरी / अपघात) तर HbA1c रीपोर्ट कमी येतो.

याशिवाय काही रक्ताचे आजार (Hemoglobinopathies), सिकलसेल आनेमिया (anemia) , विटामिन C, ईत्यादी गोष्टींनी सुधा HbA1c मध्ये फरक पडतो.

त्यामुळे रक्ताची साखरेची अचूक चाचणी आणि नियंतण तपासणी साठी मधुमेह स्पेशलिस्ट डॉक्टर यांना रिकाम्या पोटी, जेवणानंतर दोन तास व HbA1c या तिन्ही चाचण्यां ची आवश्यकता आहे.

माझ उत्तर आवडले असेल तर नक्की पोस्ट लाइक करा आणि मित्रांसोबत शेअर करा.

काही प्रश्न असतील तर खाली कमेन्ट मध्ये नक्की विचारा!

जय हिंद जय महाराष्ट्र

डॉ. निखिल प्रभु

मधुमेह स्पेशलिस्ट

टॉप 5 मधुमेह रुग्णांसाठी सगळ्यात महत्त्वाच्या चाचण्या हिंदी

मधुमेह याचे शरीरावर काय वाईट दुष्परिणाम होतात?

ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी आपणास थोडी माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

आपण सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवे की मधुमेहामध्ये रक्तात साखरेची पातळी वाढलेली असते.

रक्त हे शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत जाते अगदी डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांन पर्यंत.

सोबत ही वाढलेले साखर पण सर्व शरीर भर जातेय अणि शरीराचे सर्व अवयव पोखरत आहे. जो पर्यंत अवयव पूर्णतः निष्क्रिय होत नाही तोपर्यंत लक्षणे जास्त दिसत नाही. पण ह्याचा अर्थ त्यांना इजा होत नाही अस नाही त्यामूळे तिकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.

सतत असंच बरेच वर्ष चालले की एक दिवस अवयव खराब किंवा निकामी होतो अणि मग आपल्याला लक्षणे दिसू लागतात आणि जाग येते.

तेव्हा आपण डॉक्टर शोधायला लागतो पण अगोदरच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवली असती तर तो दिवसच पाहिला जाण्याची गरज नसती पडली हे आपण लक्षात घ्यायला हवे. माझे हे वीडियो काढण्याचा किंवा हे लिखाण करण्याचा हाच हेतू आहे की समाजात ह्याची जागरूकता निर्माण व्हायला हवी.

जेव्हा साखर रक्तातून संपूर्ण शरीरात पोहोचते तेव्हा सर्व शरीरातील अवयव आणि पेशी नादुरुस्त होणार आहे कारण उच्च साखरे साठी अवयव बनलेच नाहीत.

आता कोणते अवयव हे पहिले नादुरूस्त होतात आणि का?

साधारण पणे पायाच्या नसा (nerve) , डोळ्याचा पडदा (retina) अणि किडनी ह्या तीन गोष्टी पाहिल्या नादुरुस्त होऊ लागतात आणि ह्याना मायक्रोव्हाकुलर कॉम्प्लेकिशन (micro vascular complications) अस म्हणतात. कारण ह्या तीन अवयवांना शुगर संरक्षण भिंत (barrier) नसते त्यामुळे रक्तात वाढलेली सर्व शुगर डायरेक्ट ह्या अवयव च्या पेशींमध्ये शिरते अणि डॅमेज करते.

हळू हळू बाकी अवयव देखील डॅमेज होऊ लागतात. कारण सतत रक्तातून वाढलेली जास्त शुगर आत जात असते.

ह्यात हृदय धमन्यां चा समावेश असतो. धमन्यां म्हणजे शुद्ध रक्तवाहिन्या. आता रक्त वाहिन्या डॅमेज व्हायला सुरुवात झाली की त्या संपूर्ण शरीर भर होऊ लागतात.

मेंदू ला रक्त पोहोचवणारी रक्त वाहिनी ब्लॉक झाली की ‘स्ट्रोक’ अथवा ‘लकवा’ मारतो.

हृदयाला जाणारी ब्लॉक झाली की “हार्ट अ‍ॅटॅक” .

पायाला जाणार्‍या ब्लॉक झाल्या की जखमा बर्‍या ना होणे. पेरिफेरल वासकुलर डीसिज (PVD) . पायावर अल्सर ईत्यादी

सेक्स प्रोब्लेम पण ह्यात समाविष्ट आहे. कारण त्यात लिंगाचा रक्तस्त्राव कमी होतो.

असे प्रत्येक शरीराच्या भागांना दुखापत होऊ लागते. मग त्वचा, हाड, मेंदू (विसरणे) हे सर्वच आले त्यात.

एक एक करत मधुमेह शरीरातील प्रत्येक गोष्ट नादुरूस्त करतो, आता हे डॅमेज कालावधी वर अवलंबून असत. जास्त कालावधी जास्त डॅमेज. म्हणजे ज्याना जास्त वर्षा पासुन मधुमेह आहे त्यांना जास्त शरीराच्या अवयवांना डॅमेज.

त्यामूळे जेवढा तरुण रुग्ण तेवढ जास्त कडक शुगर नियंत्रण गरजेचे आहे कारण पुढच्या आयुष्याची 60–70 वर्षे त्याला मधुमेह सोबत जगायचा आहे.

मी हेच उदाहरण सह समजवण्याचा प्रयत्न केला आहे वीडियो मध्ये.


आवडलं तर like करा आणि अशाच माहिती साठी माझ्या चॅनल ला subscribe करा.

2025 नंतर भारत मधुमेह साठी ‘ जागतिक हब ‘ बनणार आहे. मधुमेह विषयी सामान्य जनतेत जागरुकता महत्त्वाची आहे.

धन्यवाद

जय हिंद जय महाराष्ट्र

डायबेटिक कीटोअसिडोसिस – लांब उपवास दरम्यान वाढत्या चिंताचा एक भाग

डायबेटिक कीटोअसिडोसिस – लांब उपवासा दरम्यान वाढत्या चिंताचा एक भा

मधुमेह केटोएसिडोसिस (डीकेए) :

डीकेए मधुमेहाचा एक तीव्र, मोठा आणि जीवघेणा धोका आहे जो मुख्यतः मधुमेह असलेल्या लोकांमध्ये होतो. ह्यात हायपरग्लिसियामिया म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे (>250mg/dl), केटोएसिडोसिस (रक्तात कीटोंनची मात्रा वाढणे) आणि केटोन्यूरिया (लघवीत कीटोंन) या तीन गोष्टींचा प्रामुख्याने समावेश होतो.
डीकेएचे सर्वात सामान्य प्रारंभिक लक्षण म्हणजे पॉलीडीप्सिया (वाढलेली तहान) आणि पॉलियूरिया (लघवीत वाढ) मध्ये अनपेक्षित वाढ.

डीकेएच्या इतर चिन्हे आणि लक्षणे खालीलप्रमाणे आहेतः

  1. थकवा, सर्वसाधारण अशक्तपणा, काम करण्याची इच्छा नसणे
  2. मळमळ आणि उलट्या; ओटीपोटात वेदना, भूक कमी होणे आणि एनोरेक्सिया
  3. घाम कमी येणे

डायबेटिक कीटोअसिडोसिस

मधुमेह असलेल्या लोकांसाठी उपवास संबंधित आव्हाने

नवरात्रि आणि दुर्गा पूजेच्या उत्सवादरम्यान मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तातील ग्लूकोज नियंत्रणासंदर्भात अनेक आव्हाने आहेत,

एकावेळी उपवास आणि त्या नंतर भरपूर खाणे यामुळे रक्तातील साखरेची मात्रा फारच वर खाली होते याला (Glycemic variation) अस म्हणतात जे शरीराला अपायकारक आहे. यामुळे मधुमेह रुग्णांमध्ये होणारे आजार आणि मृत्यू यांचे प्रमाण वाढते.

  • लांबच लांब उपवासानंतर जास्त खाणे किंवा पोट फुटेस्तोवर खाणे होते यामुळे रिबॉउंड हैपेर्ग्लयसिमीया (रक्ततीतील साखरेत वाढ) होते.
  • “औषधे अथवा इन्सुलिन बंद करणे” याशिवाय डिहायड्रेशन किंवा द्रव पदार्थांचे सेवन कमी करणे या मुळे डायबेटिक कीटोअसिडोसिस (डी के ए ) चे प्रमाण वाढते.
  • खरं तर, भारतातील टाइप १ डायबिटीस असलेल्या लोकांमध्ये धार्मिक उपवासाशी संबंधित इंसुलिन थांबवणे ही एक सामान्य गोष्ट आहे की ज्यामुळे डि के ए होण्याची शक्यता वाढते.
  • रक्ताच्या वाढलेल्या घनतेमुळे थ्रोम्बोसिस आणि लकवा (स्ट्रोक) चे प्रमाण वाढते. याशिवाय डिहायड्रेशन किंवा शरीरातील पाण्याची मात्रा कमी होणे यामुळे उभे राहिले कि रक्तदाब घसरणे ( पोस्टुराल हायपोटेन्शन ) आणि सिंकोप चे प्रमाण वाढते.
  • वृद्ध व्यक्तीं मध्ये इलेकट्रॉईट इम्बॅलन्स (electrolyte imbalance) आणि आल्टरेड सेन्सॉरम (altered sensorium) याचे प्रमाण ऑस्मॉटिक ड्युरेसिस (osmotic diuresis) म्हणजे वाढलेल्या रक्तातील साखरे मुळे लघवी वाढणे या कारणांमुळे वाढले आहे.

उपवास सुरक्षित कसा रहावा ?

  1. उपवास काळात, जर रक्त ग्लूकोज <70 मिलीग्राम / डीएल याच्या खाली गेले तर ते लगेच उपवास मोडला पाहिजे.
  2. उपवास स्थितीत रक्त ग्लूकोज लक्ष्य 100-200 मिलीग्राम / डीएल आहे.
  3. ग्लाइसेमिक परिवर्तनशीलतेचे मूल्यांकन करण्यासाठी उत्सवादरम्यान मधुमेह असलेल्या लोकांना एसएमबीजी चार्टिंगचे (SMBG charting) लेखांकन करणे फारच उपयोगी ठरू शकते.

अल्पकालीन उपवासासाठी शिफारसी :

  • कोणत्याही दुपारच्या वेळेची थेरेपी, उदा. मेटाफॉर्मिन, रेपागलिनाइड, अकार्बोस, व्होग्लोबोज किंवा जलद कृती (फास्ट ऐक्टिंग) इंसुलिन उपवासा दिवशी थांबवावे लागेल. रात्री जेवणाच्या वेळी थेरपीला सामान्यत: काही बदल करण्याची गरज नसते, तथापि, उपवास सोडण्याआधी व्यक्ती औषध घेऊ शकतात.
  • उपवास करणार्या व्यक्ती जे उपवास करताना एकेक जेवण घेतात, जसे की सोमवार किंवा मंगळवार (सोमवार किंवा मंगळवार) यावेळी ते जे अल्पोपाहार घेतात त्या आधी , अल्प-कार्य करणार्या औषधांच्या एका डोसमधून लाभ घेऊ शकतात जे पोस्ट-प्रिंडियल ग्लाइकेमियाला (जेवणानंतर ची साखर) लक्ष्य करते. हे महत्वाचे.

तुम्हाला हि माहिती आवडल्यास तुमच्या प्रियजनशी नक्की शेअर करा !

दात आणि तोंडाच्या आरोग्यावर मधुमेहाचा प्रभाव

दात आणि तोंडाच्या आरोग्यावर मधुमेहाचा प्रभाव

मधुमेह असलेल्या लोकांना मौखिक आरोग्य समस्या विकसित करण्याचा धोका असतो. एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील साखर खराब नियंत्रित असल्यास, ती / तिला तोंडी आरोग्य समस्या विकसित होण्याची अधिक शक्यता असते. असं होतं कारण अनियंत्रित मधुमेहामुळे पांढर्या रक्त पेशी कमजोर होतात, ज्या शरीराच्या मुख्य संरक्षणास तोंड देतात ज्या जीवाणूंच्या संक्रमणांविरूद्ध आपला बचाव करत असतात.

तोंडाच्या स्वभोवतालचा (पेरी ओडोंटल) होणाऱ्या रोगांचा परिचय 

ही एक संसर्गजन्य इन्फ्लमेटोरी आजार आहे जी हिरड्या आणि त्याच्या संलग्न पेशी, जसे सिमेंटम, पेरी ओडोंटल लिगामेंट आणि अल्विओलर हाड याना खराब करू शकते. असंख्य अभ्यास आहेत ज्यात असे निष्कर्ष काढण्यात आले आहेत की डायबिटीज मेलिटस ही हिरड्याना येणारी सूज, जळजळ आणि स्वभोवतालच्या भागाची सूज आणि जळजळ याना कारणीभूत असून टाइप १ आणि टाइप २ मधुमेह रुग्णांना मुख्य धोकादायक घटक आहे.

दात आणि मधुमेह

दात व तोंडाच्या आरोग्यासाठी असणारे धोकादायक घटक आणि परिणाम

मधुमेह असलेल्या लोकांना याचा धोका असतो :

  • तोंड सुकणे (Dry mouth) : अनियंत्रित मधुमेहामुळे थुंकीचा प्रवाह कमी होतो, परिणामी कोरडे तोंड होते. सुकलेल्या तोंडाचे सूज येणे, अलसर्स, इन्फेकशन्स, दात किडणे इत्यादी परिणाम होतात.
  • हिरड्यांची जळजळ (जिंगिव्हिटीस) आणि पीरियडॉन्टायटीस : मधुमेहामुळे रक्तवाहिन्या अधिक जाड होतात. नंतर शरीरात संक्रमण (इन्फेकशन्स) शी लढण्याची क्षमता कमी होते.
  • तोंडातील पेशींची बरे होण्याची क्षमता कमी होते : मधुमेह असलेल्या लोकांना तोंडी शस्त्रक्रिया किंवा इतर दंत प्रक्रिया केल्यानंतर जखमा लवकर बऱ्या होत नाही कारण जखमांच्या जागी रक्त प्रवाह नीट पोहचत नाही.
  • पांढरा थर – मधुमेह असलेल्या रुग्णांना फंगल (बुरशी) इन्फेकशन जिभेला आणि तोंडाला होण्याची शक्यता वाढलेली असते.

मधुमेह असलेल्या लोकांना सुपरजेजीव्हल आणि सबजिजीव्हल दंत पॅक काढून टाकण्यासाठी दंतचिकित्सकांना भेट देणे हे पिरियोडोंन्टल रोगाचे उपचार आणि बचाव करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्राथमिक प्रतिबंधक धोरणांकडे जाणे आणि कमी आक्रमक उपचारांसह प्रारंभिक शोध घेणे आणि चांगले पूर्वानुमान असणे महत्वाचे आहे.

तुम्हाला हि माहिती आवडल्यास तुमच्या प्रियजनशी नक्की शेअर करा !