55 वर्षांच्या मधुमेही व्यक्तीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण 370 एमजी/डीएल आहे. हे किती गंभीर आहे? औषधाशिवाय काय खबरदारी घेतली पाहिजे?

हो हे गंभीर आहे. एका नॉर्मल व्यक्तीने जरी चार गुलाबजाम एकसाथ खाल्ले तरीही त्याचे रक्तातील साखरेचे प्रमाण 140 एमजी / डीएल च्या वर जात नाही. 370 म्हणजे जवळपास अडीच पट वाढले आहे.

ही साखर रक्तात वाढली आहे आणि रक्त शरीराच्या प्रत्येक अवयवांना ऑक्सिजन पोहोचवते सोबत ही चारशे शुगर ही पोचवत आहे आणि शरीरातील प्रत्येक अवयव डॅमेज करत आहे. एखादा अवयव निकामी किंवा नादुरूस्त झाला (उदा. किडनी, डोळ्याचा पडदा) की आपल्याला त्रास होऊ लागला की आपल्याला जाग येते आणि आपण डॉक्टर कडे जातो पण अगोदरच शुगर नियंत्रण चांगले ठेवले असते तर ही वेळ आली नसती हे लक्ष्यात घेतले पाहिजे. रक्तातील वाढलेली साखर ही सतत अवयवांना डॅमेज करत असते त्यामुळे कोणता अवयव कधी फेल होईल हे सांगता येत नाही. पण अस समजा की जेवढा जास्त कालावधी रक्तातील साखर अनियंत्रित राहील तितका जास्त डॅमेज. त्यामुळे आपण लक्ष हे रक्तातील साखर नियंत्रण यावर जास्त दिले पाहिजे.

अजून एक गोष्ट उदाहरण देऊन समजवण्याचा प्रयत्न करतो.

तुम्ही सर्वानी गुलाबजाम तर नक्कीच पहिला असेल. तो आपण साखरेच्या पाकात ठेवतो. साखरेचा पाक हा जाड आणि चिकट असतो. पाण्यात जेवढी जास्त साखर मिसळाल तेवढे पाणी जाड होते त्याची घनता (viscosity) वाढते.

रक्त सुधा पाण्यासारखेच आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की रक्त सुद्धा जाड होते त्याची विस्कोसिटी वाढते. आता हे जाड रक्त विस्कोसिटी वाढल्याने वाहणे कमी होते, गुठळ्या बनण्याचे चान्स वाढतो. त्यामुळे शरीरातील सर्वात लहान रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक व्हायचे चान्स वाढतात. म्हणुनच मधुमेह असलेल्या रुग्णांना हार्ट अ‍ॅटॅक किंवा लकवा (स्ट्रोक / पॅरॅलिसिस) झटका यायचे चान्स जास्त असतात.

370 एमजी/डीएल हे रीडिंग बरेच जास्त असल्याने अवयव डॅमेज सोबत हार्ट अ‍ॅटॅक किंवा स्ट्रोक अटैक चा चान्स जास्त आहे. म्हणुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध किंवा इन्सुलिन चालू करने गरजेचे आहे.

नियमित व्यायाम आणि सकस आहार हा गरजेचा आहे पण सध्या जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण बरेच वाढलेले असल्याने औषध चालू करणेच योग्य राहील.

या विषयावर तुमच्या मनात काही शंका किंवा प्रश्न असल्यास मला तुम्ही कमेन्ट मध्ये विचारू शकता.

धन्यवाद

जय हिंद जय महाराष्ट्र 🙏