ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी आपणास थोडी माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
आपण सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवे की मधुमेहामध्ये रक्तात साखरेची पातळी वाढलेली असते.
रक्त हे शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत जाते अगदी डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांन पर्यंत.
सोबत ही वाढलेले साखर पण सर्व शरीर भर जातेय अणि शरीराचे सर्व अवयव पोखरत आहे. जो पर्यंत अवयव पूर्णतः निष्क्रिय होत नाही तोपर्यंत लक्षणे जास्त दिसत नाही. पण ह्याचा अर्थ त्यांना इजा होत नाही अस नाही त्यामूळे तिकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.
सतत असंच बरेच वर्ष चालले की एक दिवस अवयव खराब किंवा निकामी होतो अणि मग आपल्याला लक्षणे दिसू लागतात आणि जाग येते.
तेव्हा आपण डॉक्टर शोधायला लागतो पण अगोदरच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवली असती तर तो दिवसच पाहिला जाण्याची गरज नसती पडली हे आपण लक्षात घ्यायला हवे. माझे हे वीडियो काढण्याचा किंवा हे लिखाण करण्याचा हाच हेतू आहे की समाजात ह्याची जागरूकता निर्माण व्हायला हवी.
जेव्हा साखर रक्तातून संपूर्ण शरीरात पोहोचते तेव्हा सर्व शरीरातील अवयव आणि पेशी नादुरुस्त होणार आहे कारण उच्च साखरे साठी अवयव बनलेच नाहीत.
आता कोणते अवयव हे पहिले नादुरूस्त होतात आणि का?
साधारण पणे पायाच्या नसा (nerve) , डोळ्याचा पडदा (retina) अणि किडनी ह्या तीन गोष्टी पाहिल्या नादुरुस्त होऊ लागतात आणि ह्याना मायक्रोव्हाकुलर कॉम्प्लेकिशन (micro vascular complications) अस म्हणतात. कारण ह्या तीन अवयवांना शुगर संरक्षण भिंत (barrier) नसते त्यामुळे रक्तात वाढलेली सर्व शुगर डायरेक्ट ह्या अवयव च्या पेशींमध्ये शिरते अणि डॅमेज करते.
हळू हळू बाकी अवयव देखील डॅमेज होऊ लागतात. कारण सतत रक्तातून वाढलेली जास्त शुगर आत जात असते.
ह्यात हृदय धमन्यां चा समावेश असतो. धमन्यां म्हणजे शुद्ध रक्तवाहिन्या. आता रक्त वाहिन्या डॅमेज व्हायला सुरुवात झाली की त्या संपूर्ण शरीर भर होऊ लागतात.
मेंदू ला रक्त पोहोचवणारी रक्त वाहिनी ब्लॉक झाली की ‘स्ट्रोक’ अथवा ‘लकवा’ मारतो.
हृदयाला जाणारी ब्लॉक झाली की “हार्ट अॅटॅक” .
पायाला जाणार्या ब्लॉक झाल्या की जखमा बर्या ना होणे. पेरिफेरल वासकुलर डीसिज (PVD) . पायावर अल्सर ईत्यादी
सेक्स प्रोब्लेम पण ह्यात समाविष्ट आहे. कारण त्यात लिंगाचा रक्तस्त्राव कमी होतो.
असे प्रत्येक शरीराच्या भागांना दुखापत होऊ लागते. मग त्वचा, हाड, मेंदू (विसरणे) हे सर्वच आले त्यात.
एक एक करत मधुमेह शरीरातील प्रत्येक गोष्ट नादुरूस्त करतो, आता हे डॅमेज कालावधी वर अवलंबून असत. जास्त कालावधी जास्त डॅमेज. म्हणजे ज्याना जास्त वर्षा पासुन मधुमेह आहे त्यांना जास्त शरीराच्या अवयवांना डॅमेज.
त्यामूळे जेवढा तरुण रुग्ण तेवढ जास्त कडक शुगर नियंत्रण गरजेचे आहे कारण पुढच्या आयुष्याची 60–70 वर्षे त्याला मधुमेह सोबत जगायचा आहे.
मी हेच उदाहरण सह समजवण्याचा प्रयत्न केला आहे वीडियो मध्ये.
आवडलं तर like करा आणि अशाच माहिती साठी माझ्या चॅनल ला subscribe करा.
2025 नंतर भारत मधुमेह साठी ‘ जागतिक हब ‘ बनणार आहे. मधुमेह विषयी सामान्य जनतेत जागरुकता महत्त्वाची आहे.
धन्यवाद
जय हिंद जय महाराष्ट्र
Facebook Comments