55 वर्षांच्या मधुमेही व्यक्तीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण 370 एमजी/डीएल आहे. हे किती गंभीर आहे? औषधाशिवाय काय खबरदारी घेतली पाहिजे?

हो हे गंभीर आहे. एका नॉर्मल व्यक्तीने जरी चार गुलाबजाम एकसाथ खाल्ले तरीही त्याचे रक्तातील साखरेचे प्रमाण 140 एमजी / डीएल च्या वर जात नाही. 370 म्हणजे जवळपास अडीच पट वाढले आहे.

ही साखर रक्तात वाढली आहे आणि रक्त शरीराच्या प्रत्येक अवयवांना ऑक्सिजन पोहोचवते सोबत ही चारशे शुगर ही पोचवत आहे आणि शरीरातील प्रत्येक अवयव डॅमेज करत आहे. एखादा अवयव निकामी किंवा नादुरूस्त झाला (उदा. किडनी, डोळ्याचा पडदा) की आपल्याला त्रास होऊ लागला की आपल्याला जाग येते आणि आपण डॉक्टर कडे जातो पण अगोदरच शुगर नियंत्रण चांगले ठेवले असते तर ही वेळ आली नसती हे लक्ष्यात घेतले पाहिजे. रक्तातील वाढलेली साखर ही सतत अवयवांना डॅमेज करत असते त्यामुळे कोणता अवयव कधी फेल होईल हे सांगता येत नाही. पण अस समजा की जेवढा जास्त कालावधी रक्तातील साखर अनियंत्रित राहील तितका जास्त डॅमेज. त्यामुळे आपण लक्ष हे रक्तातील साखर नियंत्रण यावर जास्त दिले पाहिजे.

अजून एक गोष्ट उदाहरण देऊन समजवण्याचा प्रयत्न करतो.

तुम्ही सर्वानी गुलाबजाम तर नक्कीच पहिला असेल. तो आपण साखरेच्या पाकात ठेवतो. साखरेचा पाक हा जाड आणि चिकट असतो. पाण्यात जेवढी जास्त साखर मिसळाल तेवढे पाणी जाड होते त्याची घनता (viscosity) वाढते.

रक्त सुधा पाण्यासारखेच आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की रक्त सुद्धा जाड होते त्याची विस्कोसिटी वाढते. आता हे जाड रक्त विस्कोसिटी वाढल्याने वाहणे कमी होते, गुठळ्या बनण्याचे चान्स वाढतो. त्यामुळे शरीरातील सर्वात लहान रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक व्हायचे चान्स वाढतात. म्हणुनच मधुमेह असलेल्या रुग्णांना हार्ट अ‍ॅटॅक किंवा लकवा (स्ट्रोक / पॅरॅलिसिस) झटका यायचे चान्स जास्त असतात.

370 एमजी/डीएल हे रीडिंग बरेच जास्त असल्याने अवयव डॅमेज सोबत हार्ट अ‍ॅटॅक किंवा स्ट्रोक अटैक चा चान्स जास्त आहे. म्हणुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध किंवा इन्सुलिन चालू करने गरजेचे आहे.

नियमित व्यायाम आणि सकस आहार हा गरजेचा आहे पण सध्या जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण बरेच वाढलेले असल्याने औषध चालू करणेच योग्य राहील.

या विषयावर तुमच्या मनात काही शंका किंवा प्रश्न असल्यास मला तुम्ही कमेन्ट मध्ये विचारू शकता.

धन्यवाद

जय हिंद जय महाराष्ट्र 🙏

पोट साफ करण्यासाठी घरगुती उपाय करण्याचे 6 मार्ग मधुमेह रुग्णांसाठी

मधुमेहामधील बद्धकोष्टतेवर घरगुती उपाय करण्याचे 6 मार्ग

बहुतांशी मधुमेहाचे रुग्ण हे बद्धकोष्टता (पोट साफ न होणे) , पोटाच्या वेदना, अपचन, अनियमित पचनाने पीडित असतात. प्रमाणाबाहेर असलेला मधुमेह किंवा अतिप्रमाणात असणारी रक्तशर्करा यामुळे पोट आणि आतड्याच्या (gastro-intestinal tract) स्नायू आणि मज्जातंतू यांवर विपरीत परिणाम होतात. तसेच याचा परिणाम आंत्राचलनाच्या कामावर देखील होतो. यामुळे काय होते की जठर आणि आतड्यांचा मध्ये अन्न साठून राहिला सुरुवात होते. मधुमेहामुळे पोट आणि आतड्याच्या सुरवातीच्या नळासारखया तोटीवर (pyloric sphincter) चा पुरवठा देखील अनियमित होतो, या अनियमित पुरवठ्यामुळे त्या टोटीचे रेलॅक्सेशन कमी होते आणि पोट साफ होण्यास विलंब होतो. मधुमेहामुळे पोटापर्यंत अन्नकण पूर्णपणे क्रश किंवा बारीक होऊन जाण्यास तसेच पोटात अन्नाचा कण व्याप्ती होण्यास अडथळा निर्माण होतो ज्याची परीनीती अपचाना मध्ये होते. सामान्यतः आपण सेवन केलेले अन्न 36 ते 48 तासांमध्ये मलमार्गापर्यंत पोहोचते. मधुमेही रूग्णांमध्ये मात्र जठरासंबधित गतीमधील असमतोला मुळे हा वेळ अजून वाढतो आणि बद्धकोष्टतेचा म्हणजेच पोट साफ न होण्याचा त्रास सुरू होतो.

pot saf karayche gharguti upay

बद्धकोष्ठतेवर घरच्या घरी करण्यासारखे सहा उपाय :

1. आहारामधील तंतुमय पदार्थांचे (fibers) सेवन वाढवावे –

आहारामध्ये तंतूमय पदार्थांचे दोन प्रकार पडतात, विरघळणारे आणि न विरघळणारे (insoluble आणि soluble). या प्रकारच्या आहारामुळे विष्टेला आकार प्राप्ती होते तसेच त्यातील पाण्याचे प्रमाण वाढते. वाढलेल्या पाणी पातळी मुळे मलमार्ग रिकामा होण्यास मदत होते.

फायबर असलेलं अन्नपदार्थ – डाळी, बीन्स हे तंतुमय पदार्थांचे भांडार आहे. हिरव्या पालेभाज्या, सफरचंद, पीयर, बेरी हे पदार्थ मधुमेही रुग्णांसाठी अतिशय चांगले आहेत. सकाळचा न्याहारी मध्ये ओट्स घेतले, तर फायबरचा साठा दिवसाच्या सुरुवातीलाच मिळून जातो.

2. भरपूर पाणी पिणे :

जर तुम्ही पुरेसे पाणी नाही घेतले, तर शरीर तुम्ही सेवन केलेल्या अन्ना मधून पाण्याचा अंश काढते. या मुळे तयार होणारे मल हे अती कडक तयार होते. तुम्ही जर आहारामध्ये तंतुमय पदार्थाचे प्रमाण वाढवत असाल, तर पाण्याचे प्रमाण पण वाढवले पाहिजे. दिवसभराचे 1.5 ते 2 ली. पाणी कमीतकमी सेवन केले पाहिजे.

3 नियमित व्यायाम :

सर्व मधुमेही रुग्णांना नियमित व्यायाम हा अती आवश्यक आहे. व्यायामामुळे रक्तशर्करा प्रमाणात राहतेच त्याबरोबर अन्नाचा मल मार्ग पर्यंतचा प्रवास सुकर होतो. भराभर चालण्याच्या सध्या व्यायाम मुळे देखील बद्धकोष्टता कमी होऊ शकते. आणि चालल्याने जेवण आतड्यात पुढे ढकलले जाते त्यामुळे पोट साफ करण्यासाठी मदत होते.

3. प्राकृतिक प्रोबायोटिक :

रोजच्या आहारामध्ये एक वाटी दही किंवा एक ग्लास ताक यांचे सेवन केल्यामुळे शरीरातील प्रोबायोटिक (probiotics)म्हणजेच सजीव सूक्ष्मजीवांचे प्रमाण पातळी अनुसार रहाते, जेणेकरून अन्नपचन योग्यरीत्या होते आणि अपचनाची भीती राहत नाही.

4. रेचक (laxatives) :

रेचक विविध प्रकारचे असतात, तसेच त्यांचे मलमर्ग सुरळीत ठेवण्यासाठी चे कार्य पण वेगवेगळे असतात. एसबगोल आणि एरंडेल हे सामान्यतः वापरले जाणारे रेचक आहेत.

5. रक्तशर्करा प्रमाणित करणे :

नियमित आहारामधून रक्तशर्करा प्रमाणात ठेवणे हे मधुमेहातील बद्धकोष्टता कमी करण्याचची सर्वात सोपी पद्धत आहे. नियमित व्यायाम आणि योग्य औषधांचे सेवन यामुळे मधुमेह आतील बद्धकोष्टता काही अंशी कमी होऊ शकते. मधुमेहातील बद्धकोष्टता कोणत्या कारणामुळे झाली आहे हे सांगणे तसे अवघडच आहे कारण, हे बद्धकोष्टता मधुमेहाकडे केलेल्या दुर्लक्षामुळे किंवा मधुमेहामुळे झालेल्या आंतरिक डॅमेज मुळे किंवा तंतुमय पदार्थांच्या कमी सेवनामुळे अशा कोणत्याही कारणांमुळे होऊ शकते.

6. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे योग्य आहार, नियमित व्यायाम आणि रोज वेळेवर औषध सेवन करणे यांनी हेच पोट साफ न होणे यावरील रामबाण उपाय आहे.

मधुमेहातील बद्धकोष्टता अतिशय वृद्ध रुग्णांना त्रासदायक ठरू शकते. जर हे हालचाल करू न शकणाऱ्या एका जागी असणाऱ्या रुग्णांपैकी असतील तर त्यांना एनिमा देणे किंवा एकदमच एक्स्ट्रीम केस मध्ये स्वतः डॉक्टर हाताने मल मार्ग साफ करवने हा एकच उपाय उरतो.
मधुमेह रूग्ण मध्ये असलेली बद्धकोष्ठता कमी करण्याचे हे घरगुती 6 उपाय आहेत.

वरील लेख आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवार आणि परीजणांसोबत नक्की शेअर करा.

रक्ततील शर्करेचे म्हणजेच ब्लड ग्लुकोज चे स्वतः लक्ष ठेवून मूल्यमापन करणे – SMBG तक्ता

शरीरातील रक्तशर्करेचे म्हणजेच ब्लड ग्लुकोज चे स्वतः लक्ष ठेवून मूल्यमापन करणे – SMBG तक्ता

मधुमेह असणाऱ्या रुग्णांना शरीरातील रक्त शर्करा प्रमाणात ठेवणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यातही जर मधुमेहाचे रुग्ण इन्सुलिन किंवा त्यासारख्या मधुमेह औषधे की ज्यामुळे हायपोग्लायसेमिया म्हणजेच शरीरात रक्तशर्करेचे कमतरता जाणवू शकते या रुग्णांना स्वतः स्वतःच्या रक्तशर्करेचे मूल्यमापन करणे अनिवार्य म्हणून जाते.

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आपली प्रकृती निरोगी ठेवण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांनी दिवसभरातील खान पणामुळे रक्तशर्करा वर होणारे परिणाम तपासून घेणे आणि त्याची नोंद ठेवणे हा एक उत्तम उपाय आहे. अशा पद्धतशीर केलेल्या नोंदी मुळे डॉक्टरांना तुमच्या आहारा अनुसार ट्रीटमेंट देणे किंवा आहारातील बदल सुचवणे सोपे जाते.

मधुमेहाच्या रूटीन फॉलोअप साठी शरीरातील रक्तशर्करा म्हणजेच ब्लड ग्लुकोज मोजताना दोन प्रकारे मोजले जाते. पहिली म्हणजे फास्टिंग शुगर जी की काही न खाता न पिता चेक केले जाते आणि त्याच दिवशी जेवणा नंतर दोन तासांच्या अंतराने पुन्हा एकदा ब्लड शुगर लेवल मोजली जाते.

HbA1c किंवा हीमोग्लोबिन टेस्ट मध्ये पण आपल्याला मागील तीन महिन्यांचे रक्तशर्करेचे सरासरी प्रमाण भेटू शकते.

बऱ्याच वेळा असे दिसून येते की रुग्णांचे फास्टिंग आणि जेवणानंतरची शुगर यांच्या पातळी प्रमाणात आहेत परंतु HbA1c लेवल मात्र 7 च्या खाली येत नाही, याचे प्रमुख कारण म्हणजे नियमित आहारात पथ्ये न पाळणे आहे.

ज्या दिवशी तुम्हाला शुगर टेस्ट करायची त्या दिवशी तुम्ही प्रमाणात आहार घेतला म्हणजे तुमची शुगर प्रमाणात राहील असे नाही .रोजच्या आहारामध्ये आपल्या शरीराची गरज आणि मधुमेह तज्ञ मान्य आहार घेणे केव्हाही फायद्याचे आहे.

SMBG तक्ता –

SMBG Chart Free download
SMBG तक्त्याची सविस्तर माहिती –

वरील तक्त्यामध्ये 7 भाग केलेले आहेत, ज्यामध्ये तुमच्या रक्त शर्करेचे नोंदणी करणे अपेक्षित आहे. याला आपण रक्तशर्करे चे स्वतः मूल्यमापन करताना
तक्त्याचे 7 भाग –

  1. नाष्ट्या आधी चे ब्लड शुगर रीडिंग.
  2. नाश्त्यानंतर 2 तासा नंतर चे रीडिंग.
  3. दुपार चे जेवण (lunch) आधी चे आधी रीडिंग.
  4. दुपारच्या जेवनानंतर 2 तासानंतर (Post Lunch) चे रीडिंग.
  5. रात्री च्या जेवण (डिनर) आधी चे रीडिंग.
  6. डिनर नंतर 2 तासा नंतर चे रीडिंग.
  7. रात्री 3 वाजता घेतलेले रीडिंग .

या 7 पॉईंट्स मध्ये संपूर्ण दिवसामध्ये रक्तशर्करे मध्ये होणारे बदल कव्हर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

याप्रकारे केलेले रक्तशर्करेचे निदान हे शंभर टक्के बरोबर असतील असे नाही आणि CGMS टेस्ट एवढे बरोबर असतील असे नाही.

वरील चार्ट मध्ये कमेंट नावाचा पण एक कॉलम आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आहारातील बदल किंवा काही वेगळे घडले असेल तर औषधांमधील बदल ठेवू शकता. जर तुम्हाला जेवणाआधी हायपोग्लायसेमिया झाल्यासारखे वाटत असेल आणि त्या दिवशी जर तुम्ही ब्रेकफास्ट नाही केला आहे, अशा प्रकारच्या नोंदी करून ठेवलेली असेल तर डॉक्टरांना निदान करणे सोपे जाते.

मूल्यमापन करण्यासाठी तुम्हाला रोजच वर नमूद केलेले 7 पॉईंट चेक करणे गरजेचे नाहीये तुमच्या सोयीनुसार कोणतेही दोन वेळा केल्या तरी मूल्यमापन होते. असे असले तरीही, ग्लुकोमीटर मॉनिटरिंग आपल्या ब्लड शुगर च्या वाढलेल्या – कमी झालेल्या लेव्हल नुसार ठरवावे. ज्या रुग्णांना नियमितपणे रक्तशर्करा कमी जास्त होण्याचा त्रास होत असेल, त्यांनी दोन पेक्षा जास्त वेळा नियमितपणे मूल्यमापन करावे.

आपल्या घरी नियमितपणे रक्त शर्करेचे मूल्यमापन करणे हे गर्भधारणेच्या काळात उद्भवलेल्या मधुमेहामध्ये आणि गेस्टेशनल (gestational) मधुमेहामध्ये खूपच महत्त्वाचे ठरते.

वर दिलेला SMBG तक्ता हा JPG म्हणजे फोटो फॉरमॅट मध्ये आहे तो आपण सेव करून प्रिन्ट करून घेऊ शकता आणि त्यावर नोंदणी करू शकता.

या लेखानंतर आपण शरीरातील ब्लड ग्लुकोज लेव्हल चे मूल्यमापन अजून कार्यक्षमपणे करू शकाल. अशी आशा आहे. तुम्हाला जर तुमच्या तक्त्यामध्ये जेवणाआधी नंतर कधीही नोंदी खूपच कमी किंवा जास्त आढळल्यास तो तक्ता घेऊन तुम्ही आपल्या डॉक्टरांना भेटून घ्यावे. तुमच्या गोळ्या-औषधांचे डोस त्याप्रमाणे ऍडजेस्ट करून घ्यावेत.

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवार आणि परी जणांसोबत नक्की शेअर करा..🙏🏻🙏🏻🙏🏻

मधुमेहातील वजन वाढ रोखण्याचे पाच उपाय…

लठ्ठपणा आणि टाइप 2 मधुमेह यांचा परस्पर असलेला संबंध वारंवार विविध अभ्यासामधून प्रस्थापित झालेला आहे. लठ्ठपणा आणि टाइप 2 मधुमेह यांचा परस्पर संबंध हा अत्यंत जटिल आणि विविध कारणांनी एकमेकांत गुंतलेला आहे. लठ्ठपणा हे नुसते मधुमेहासाठी चे एक अत्यंत घातक असे कारणच नाही तर या आजाराचे निदान करण्याच्या मार्गातील मोठा अडसर देखील आहे.

मधुमेहाचा धोका वाढवणारी कारणे :-

  1. वाढलेले वजन किंवा लठ्ठपणा – मधुमेहाचा धोका असणाऱ्या व्यक्तींमध्ये जी लक्षणे आढळून येतात त्यामध्ये वाढलेले वजन हे लक्षण प्रामुख्याने दिसून येते. या वजन वाढीचे प्रमाण हे बॉडी मास इंडेक्स म्हणजेच बीएमआय (BMI) यावरून मोजले जाते. BMI>23 किंवा BMI=25 kg/m असेल तर त्या व्यक्तीला लठ्ठपणामुळे मधुमेहाचा धोका उद्भवू शकतो.
  2. शारीरिक हालचालींचा अभाव
  3. आईवडिलांकडून जनुकीय रित्या आलेला टाइप 2 मधुमेह.
  4. जनुकीय रित्या जास्त धोका असलेल्या प्रदेशातील समूह ( आफ्रिकन अमेरिकन, अमेरिकन इंडियन किंवा अलास्का नेटिव अमेरिकन अशियन, हिपनिक किवा लॅटिन, हवाईन किंवा पॅसिफिक islander)
  5. उच्च रक्तदाब ( 140/190 mm Hg)
  6. हाय कोलेस्ट्रॉल (240 mg/dL or higher)
  7. इन्सुलिन विरोधक शारीरिक व्याधी किंवा त्वचेचे अवरण निर्माण होणे, (“acanthosis nigricans”)
  8. Cardiovascular आजारांची परंपरा.
  9. प्री डायबेटिक स्तरावर असणे.

मधुमेहातील लठ्ठपणा व्यवस्थापित करण्यासाठी चे उपाय-

1. आहाराचे नियोजन –

  •  बेकरी प्रोडक्ट जसे की बिस्कीट केक अशा प्रकारचे अन्न मधुमेहाची मधुमेह होण्याची शक्यता वाढते त्यामुळे ते पूर्ण बंद कराव्यात.
  • पॅकबंद आहार तळलेले तेलकट पदार्थ प्रोसेस फुड अशा प्रकारचे अन्नपदार्थ मधून ट्रान्स fatty acid आपल्या शरीरात जातात ते पूर्णपणे बंद करावेत.
  • आपल्या शरीरात चांगले फॅट्स जाण्यासाठी नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करवा जसे की सुकामेवा, मासे आणि अंडे.

2. योग्य पोषणद्रव्या यांचा आपल्या आहारात समावेश करावा –

आहारात केलेले बदल हे पेशंटच्या दृष्टीने योग्य असावेत, त्यामध्ये खालील पोषक द्रव्यांचा समावेश असावा.

  • उच्चप्रतीचे मल्टी विटामिन आणि मिनरल्स.
  • ओमेगा3 फॅटी ऍसिड चे एक ते दोन ग्रॅम.
  • विटामिन D3 चे 1000 ते 2000 IU s.
  • 300-६००mg अल्फा लीपोईच् एसिड दिवसातून दोनदा.
  • 200-६००mcg क्रोमियम पोलीनिकॉटीनात.

3. वजन कमी करणे –

लठ्ठपणा

वजन कमी करण्या मुळे शरीरातील ब्लड ग्लुकोज लेव्हल प्रमाणामध्ये राहते जेणेकरून टाइप 2 मधुमेह प्रमाणामध्ये राहण्यास मदत होते. लठ्ठ व्यक्तींमध्ये सुद्धा पोटाच्या भागात चरबी असणाऱ्या लोकांना (apple shaped) मधुमेहाचा धोका हा कंबर आणि पार्श्व भागांमध्ये वजन असणाऱ्या (pear shaped) व्यक्तीपेक्षा जास्त असतो.
नियमित व्यायाम आणि योग्य आहार घेतल्यास वजन कमी करण्यासl व कमी झालेले वजन टिकवून ठेवण्यास मदत होते.

4. योग्य व्यायाम प्रकार निवडणे-

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना जिम मध्ये तासंतास व्यायाम करण्याची गरज नाही, नियमितपणे तीस मिनिट चालण्याचा व्यायाम केला तरी पुरे.
चालण्याच्या व्यायामामुळे शरीरातील ब्लड शुगर लेवल प्रमाणात ठेवण्यास मदत होते तसेच इन्सुलिनची मात्र अत्यंत कमी होते.

5. नियमितपणे प्रकृतीकडे लक्ष देणे-

पेशंट्सना आपने आपल्या प्रगतीचे रेकॉर्ड ठेवण्यास सांगावे, मग ते आठवडे आठवड्याने वजन करणे असो किंवा त्यांच्या व्यायामाचा आलेख नोंदवून ठेवने असो. एका अभ्यासावरून असे दिसून आले आहे की जे लोक आपल्या प्रगतीचा आलेख नोंदवुन ठेवतात त्यांचे वजन इतरांपेक्षा दुपटीने लवकर कमी होते.
यासाठी पेशंट पेपर pad, नोटबुक्स किंवा कम्प्युटर मधले स्टेट्स किंवा गुगल फिट सारखे यांचा उपयोग करू शकतात. याबरोबरच पेशंट ना त्यांचे वजन, बीएमआय, ब्लडप्रेशर अशा गोष्टीं ची पण वेळोवेळी नोंदणी करण्यास सांगावी.. बऱ्याच वेळा या नोंदीमुळे वजन कमी करण्यासाठी नियमितपणे व्यायाम करण्यासाठी जोश निर्माण होतो.

 

वर सांगितलेले साधे साधे पण अत्यंत उपयुक्त असे उपाय योजल्या यामुळे ब्लड ग्लुकोज लेव्हल प्रमाणात ठेवण्यात खूप हातभार लागतो तसेच टाइप 2 मधुमेह व्यवस्थापनातही मदत होते. रोजच्या जीवनात केलेल्या साध्या साध्या बदलांमुळे पेशंटच्या जीवनात खूप फरक पडू शकतो तसेच त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मदत होते.

 

हायपोग्लायसेमिया (रक्तातील साखरेची पातळी कमी होणे) यावर घरी उपचार कसे करावेत

हायपोग्लायसेमिया (रक्तातील साखरेची पातळी कमी होणे) यावर घरी उपचार कसे करावेत

हायपोग्लायसेमिया म्हणजेच रक्तातील साखरेची पातळी कमी होणे. टाइप 1 मधुमेह आणि टाइप 2 मधुमेह या दोन्ही प्रकारच्या मधुमेहाचे हे एक स्वाभाविक लक्षण आहे.

मधुमेहाचे पेशंट जे इन्सुलिन ट्रिटमेंटवर आहेत किंवा टाइप 2 मधुमेहावर उपचारासाठी काही प्रकारच्या डायबेटिक रोधक गोळ्या-औषधे घेत आहेत, त्यांना हायपोग्लायसेमिया होण्याचा संभव जास्त आहे.

अशा औषधांमध्ये sulphonylureas ( glimeperide, gliclazide, glibenclamide or glyburide & glipizide) किंवा megitinides ( repaglinide, nateglinide) या इन्सुलिन वर्धक औषधांचा हायपोग्लायसेमिया हा साइड इफेक्ट असू शकतो.

माझ्या मागील लेखांमध्ये आपणास अजून औषधांबद्दल माहिती मिळेल की ज्यांच्यामुळे हायपोग्लायसेमिया किंवा हायपोग्लायसेमियाचे लक्षणे दिसू शकतात.

हायपोग्लायसेमिया

हायपोग्लायसेमिया किंवा रक्तातील साखर कमी होणे, याला सामोरे कसे जावे ?

1. हायपोग्लायसेमिया ची लक्षणे ओळखा –

हायपोग्लायसेमिया ची लक्षणे प्रत्येक व्यक्तींनुरूप बदलतात. त्यामुळे हायपोग्लायसेमिया ची सविस्तर लक्षणे आपण मागील लेखात नमूद केलेली आहेत. प्राथमिक स्थितीमध्ये हायपोग्लायसेमिया अति घाम येणे, हृदयाच्या ठोक्यात मध्ये वाढ होणे, चक्कर आल्यासारखे वाटणे, गोंधळ उडणे, विकनेस येणे, राग आल्यासारखे वाटणे या लक्षणांवरून ओळखला जाऊ शकतो.

2. लक्ष वेधून घ्या –

हायपोग्लायसेमिया च्या प्राथमिक लक्षणांमध्ये गोंधळ उडणे – चक्कर आल्यासारखे वाटणे या लक्षणांचा समावेश होतो. त्यामुळे जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही हायपोग्लायसेमिया चे बळी होत आहात, तर सर्वात आधी आपल्या घरच्यांचे किंवा ऑफिसमधील सहकाऱ्यांचे लक्ष वेधून घ्यावे. त्यांना तुमच्या लक्षण बद्दल सांगून ठेवा. जेणेकरून चक्कर आल्यानंतर तुम्ही बेशुद्ध जरी झालात तरी तुम्हाला योग्य वैद्यकीय मदत मिळू शकेल. जर तुम्ही वाहन चालवत असाल तर ते रस्त्याच्या बाजूला घेऊन थांबून घ्या. जर तुम्ही चालत असाल किंवा पाहिल्या खेळत असाल तर तिथल्या तिथे थांबून जागेवर बसून घ्या. तुमची आणि तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांची सेफ्टी हे तुमचे प्राथमिक उद्दिष्ट ठेवा.

3. चाचणी करून कन्फर्म करून घ्या –

तुमची केपिलीरी ब्लड शुगर लेव्हल ग्लुकोमीटर ने बोटाला टोचून चेक करून घ्या. जर ग्लुकोमीटर वर 70 mg/dl किंवा त्यापेक्षा कमी रीडिंग आले तर तुम्ही हायपोग्लायसेमिया ला बळी पडलेल्या आहात हे कन्फर्म होते जर तुमच्याकडे ग्लुकोमीटर नसेल तर पुढील स्टेप वर जा.

4. साखर किंवा तत्सम पदार्थांचे सेवन करा –

हायपोग्लायसेमिया म्हणजेच म्हणजेच रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यानंतर ते पूर्ववत करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे असे कार्बोहायड्रेट जे शरीरामध्ये पटकन विरघळतात जसे किन साखर यांचे सेवन करावे. मी माझ्या पेशंटस्ना Glucon-D पावडर (हिरवा डबा) चे दोन तीन चमचे जिभेवर ठेवून चघळण्यास सांगतो. त्याने शरीरातील ब्लड शुगर लेवल लगेच वाढते. भारतामध्ये ग्लुकोजच्या गोळ्या सगळीकडेच भेटतात असे नाही म्हणून खबरदारी म्हणून पंधरा-वीस ग्राम आपली साधी साखर किंवा Glucon-D कायम सोबत ठेवले डायबेटिक पेशंटसाठी चांगले. जर तुम्ही इन्सुलिन किंवा sulfonylurea सारख्या औषधांवर असाल तर तुम्ही ह्या गोष्टी जवळ नक्कीच बाळगाव्यात.

घरात सहजरीत्या असणाऱ्या खालील काही गोष्टी शरीरातील ब्लड शुगर लेवल वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

  • अर्धा कप फळांचा ज्यूस.
  • एक कप दूध.
  • एक ते दोन टेबलस्पून मध.
  • अर्धा कप सोडा किंवा सॉफ्ट ड्रिंक.
  • दोन टेबलस्पून मनुका.
  • पाच ते सहा हार्ड कॅंडीज
  • तीन-चार चॉकलेट्स (डेरीमिल्क – ईक्लेयरस वगैरे).

5. परत मोजून बघा –

शरीरातील ब्लड शुगर लेव्हल कमी झाल्यानंतर तुम्ही ती वाढवण्यासाठी खूप पण गोड पदार्थ खाऊ नका, नाहीतर अचानकच शुगर लेवल खूपच वाढेल. पंधरा-वीस मिनिटे थांबून तुम्ही ब्लड शुगर लेव्हल परत एकदा चेक करा. ती जर 70 mg/dl पेक्षा कमी असेल तर परत 15-20 gm साखर किंवा Glucon-D चे सेवन कराव. अशाप्रकारे जोपर्यंत तुमची ब्लड शुगर लेव्हल 70mg/dl पेक्षा जास्त होत नाही तोपर्यंत हा क्रम सुरू ठेवावा. तुम्हाला हायपोग्लायसेमिया चा त्रास झाल्यानंतर एक तासाच्या आत तुमचे जेवण उरकून घ्यावे. जर जेवणाची वेळ जवळपास नसेल तर कार्बोहायड्रेट्स पूरक अन्नपदार्थ खाऊन घ्यावे.

6. तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी –

जर तुमच्या शरीरातील ब्लड शुगर लेव्हल वरील उपाय करूनही वाढली नाही आणि तुमचे चक्कर येणे किंवा गर्गरणे या लक्षण मधून पुढच्या स्टेजवर गेल्यात जसे की, शुद्ध हरपणे तर तातडीने वैद्यकीय मदत मिळणे अपेक्षित आहे. तुमच्या परिवाराने किंवा ऑफिसमधील सहकाऱ्यांनी अशावेळी जवळील हॉस्पिटलमध्ये तुम्हाला हलवणे योग्य राहील. हॉस्पिटलमध्ये तुम्हाला इमर्जन्सी डिपार्टमेंट मध्ये Intravenous glucose/glucagon इंजेक्शन चा उपयोग करून ब्लड शुगर लेव्हल वाढवण्याचा प्रयत्न होतो.

7. हायपोग्लायसेमिया होऊच नये यासाठी प्रयत्न करणे आणि प्रतिबंध करणे –

जर तुमच्या शरीरातील ब्लड शुगर लेव्हल सारखे सारखे कमी होत असेल, तुम्हाला हायपोग्लायसेमियाला सारखे सामोरे जावे लागत असेल तर तुम्ही डॉक्टरांना भेटणे अपेक्षित आहे. तुम्हाला एकदा जरी उच्च पातळीचा हायपोग्लायसेमिया अटॅक आला असेल तरी तुम्ही डॉक्टरांना भेटावे. डॉक्टरांना भेटून तुमच्या गोळ्या-औषधे आणि इन्सुलिनचे डोस तुमच्या दिनचर्या प्रमाणे परत एकदा ठरवून घ्यावेत. डॉक्टर सोबत चर्चा करून भविष्यात पुन्हा असे होऊ नये यासाठी प्रतिबंधक उपाय योजना करून घ्यावी.

तुम्हाला जर हा लेख आवडला असेल मदत पूर्ण वाटला असेल तर परिवार जण आणि मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा तुमचा फीडबॅक आणि कौतुक दोन्ही स्वागताहार्य आहे..🙏🏻

मधुमेहाबद्दल टॉप 10 अफवा आणि वास्तविकता

मधुमेह हा एक जागतिक आजार असून साल 2025 पर्यंत फक्त भारतात 80 कोटी लोकांना तर जागतिक पातळीवर 300कोटी लोकांना त्याची लागण झालेली असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. भारतामध्ये ज्या गतीने हा आजार फोफावत आहे, त्याच्या अनुसार जन साक्षरता मात्र त्या प्रमाणात होत नाहीये. मधुमेह हा सर्वत्र सापडणारा रोग असला तरी जनतेला त्याबाबत फारसे काही शास्त्रीय ज्ञान नाही, यामध्ये असे लोकही येतात की ज्यांना मधुमेह होण्याची संभावना सर्वात जास्त आहे

या लेखा मधून आपण मधुमेहाविषयी शास्त्रीय माहिती घेऊन तिच्याबद्दल असलेल्या दंतकथांना अफवांना सोडवणार आहोत.

satya asatya madhumeh

image credit: samacharlahrein.com

अफवा 1 – मधुमेह हा रोग अति जास्त साखर खाल्ल्यामुळे होतो.

वास्तविकता – मधुमेह हा रोग जास्त साखर खाल्ल्यामुळे होत नाही.

मधुमेह या रोगाचे दोन प्रकार आहेत,

  1. टाइप 1 मधुमेह
  2. टाइप 2 मधुमेह

टाइप 1 मधुमेह (जुवेनाईल मधुमेह), या प्रकारच्या मधुमेहामध्ये शरीरामध्ये इन्सुलिन नावाचे हार्मोन तयार होत नाही. हे इन्सुलिनच आपल्या शरीरामधील ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करत असते. इन्शुलिन तयार न झाल्यामुळे शरीरामधील ब्लड शुगर लेवलवर कोणताही अंकुश राहत नाही आणि मधुमेहाची लक्षणे व्यक्तीमध्ये दिसू लागतात. टाइप 1 मधुमेह का होतो याचे याचे नक्की कारण अजूनही आपल्याला सापडलेले नाही, तज्ञांच्या अंदाजानुसार ऑटॉइम्मुनिटी,जनुकीय कारणे आणि आपल्या आसपास असलेले व्हायरल इन्फेक्शन्स हे घटक टाईप 1 मधुमेहाच्या पेशंटमध्ये प्रामुख्याने दिसून येतात.

टाइप 2 मधुमेह, या प्रकारच्या मधुमेहामध्ये शरीरात इन्सुलिन हार्मोन तयार होते परंतु ते एक तर अत्यंत कमी प्रमाणात असते किंवा तयार झालेले इन्सुलिन आपले काम चोख पणे बजावू शकत नाही त्याची पाँवर ही कमी झालेली असते किंवा एकदमच निकामी झालेली असते. टाइप 2 मधुमेहाचे हे प्रमुख कारण आहे की तयार झालेले इन्सुलिन शरीरातील ब्लड शुगर लेवल प्रमाणित करू शकत नाही. भारतीयांमध्ये टाइप 2 मधुमेहाचे प्रमुख कारण हे ॲबडाँमीनल ओबेसिटी म्हणजेच वाढलेले पोटपोटावरची चरबी हे आहे.

मधुमेहाच्या लक्षणांमध्ये अति प्रमाणात दारूचे सेवन हेदेखील प्रमुख लक्षण आहे. अति दारू सेवनामुळे वारंवार pancreatitis उद्भवतो ज्यामुळे बीटा सेल्स पूर्णपणे नाश पावतात आणि इन्सुलिनची कमतरता तयार होते, ज्याचे रूपांतर मधुमेहामध्ये होते. काही वेळेस pancreas कॅन्सर असेल तर सर्जरी करावी लागते आणि या सर्जरीमध्ये हा भाग काही अंशी किंवा पूर्णपणे काढून टाकण्यात येतो, त्यामुळे या सर्जरीनंतरही इन्सुलिनची कमतरता निर्माण होते आणि मधुमेह होण्याची शक्यता वाढते.

अफवा 2 – मधुमेहाच्या पेशंटने चॉकलेट आणि चॉकलेट सारख्या गोड वस्तू खाऊ नयेत

वास्तविकता – मधुमेहाचा रोगी चॉकलेट आणि चॉकलेट सारख्या गोड वस्तू प्रमाणामध्ये खाऊ शकतात. एकावेळी किती खायचे हे आपल्या डॉक्टरांकडून प्रमाणित करून घ्यावे

मधुमेहावर उपाय योजना म्हणजे खूप काही भव्य दिव्य नसून आपल्या शरीरातील ब्लड शुगर लेव्हल प्रमाणित करण्याची कला आहे. आपण जर आपल्या आहारावर नियंत्रण ठेवून प्रमाणामध्ये जेवण करू शकत असाल तर कोणतेही पदार्थ आपल्याला मधुमेहा मुळे वर्ज होऊ शकत नाहीत. ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणारे पदार्थ ब्लड शुगर लेव्हल कमी प्रमाणात वाढवतात तर ज्या पदार्थांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे ते पदार्थ ब्लड शुगर लेवल झपाट्याने वाढतात. नियमितपणे चालणे, सायकलिंग करणे अशाप्रकारचा मध्यम व्यायामामुळे शरीराची ब्लड शुगर लेवल कमी होण्यास मदत होते.

अफवा 3- जर तुमचे वजन जास्त असेल किंवा तुम्हाला लठ्ठपणा आणि ग्रासलेले असेल तर तुम्हाला नक्कीच डायबेटीस होणार आहे

वास्तविकता- जास्त वजन असलेल्या किंवा लठ्ठ असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मधुमेह होईलच असे नाही

वाढलेले वजन सोडून मधुमेहाची बाकीही काही लक्षणे आणि कारणे आहेत
जसे की तुमचा पारिवारिक जनुकीय इतिहास, तुमची भौगोलिक परिस्थिती वगैरे वगैरे. असे असले तरीही पोटाच्या भागात असलेला लठ्ठपणा हे हे इन्सुलिन हार्मोन ना काम होण्याचे एक प्रमुख कारण आहे ज्याने की मधुमेह होऊ शकतो.मधुमेहाची बाकी लक्षणे माझ्या मागील लेखामध्ये तुम्ही वाचू शकतात.

अफवा 4 – एकदा इन्सुलिन हार्मोन सुरू झाली की तुम्हाला ती आयुष्यभर घ्यावी लागतात

वास्तविकता- असे प्रत्येक वेळी किंवा नेहमीच होईल असे नसते

इन्सुलिन बाहेरून देण्यासाठी काही ठराविक परिस्थिती असाव्या लागतात जसे की ऑपरेशन किंवा सर्जरी च्या आधी, काही वेगळे इन्फेक्शन झालेले असतील तर किंवा खूप स्ट्रेस असेल तर, अन्यथा आहार प्रमाणित करूनही आपण मधुमेह प्रमाणामध्ये ठेवू शकतो. इन्सुलिन जखम भरण्यासाठी उपयुक्त असल्यामुळे त्याचा कंडिशन मध्ये ही इन्सुलिन चा वापर होऊ शकतो बाकी औषधांसोबत त्यांनी एकत्र येऊन काम करणे हे फार कमी बघितले जाते
मधुमेह हा एक वाढत जाणारा आजार आहे. जेव्हा मधुमेहाचे प्रथम निदान होते त्या वेळी शरीरातील 50 टक्के बिटा सेल या मृत पावलेल्या असतात. Sulfonylurea या औषधाच्या उपयोगामुळे पुढील काही वर्षांमध्ये बीटा सेल्सची संख्या अजूनच कमी कमी होत जाते. साधारण सात ते दहा वर्षांनंतर अशी परिस्थिती येते की या बीटा सेल्स इन्सुलीन तयार करू शकत नाही आणि बाहेरून इन्सुलिन घेण्याची गरज भासते. टाइप 2 मधुमेह असणाऱ्या कमीत कमी 25 टक्के पेशंट ना अशी बेटा सेल्स निकामी झाल्याची आणि इन्शुलिन शरीराला बाहेरून घेण्याची गरज निर्माण होते.

अफवा 5 – मधुमेह हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो

वास्तविकता – मधुमेह पूर्णपणे बरे करणारे निदान अजूनही अस्तित्वात नाही आहे.

मधुमेह हा रोग प्रमाणित आहार नियमित व्यायाम आणि योग्य औषधोपचार यामुळे नियंत्रित राहू शकतो परंतु पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. जर तुम्ही प्रीं डायबेटिक स्टेजला असाल तर हा मधुमेह उलटवता येऊ शकतो किंवा लांबविता येऊ शकतो. त्यासाठी देखील तुम्हाला नियंत्रित आहार नियमित व्यायाम आणि वजन कमी करणे ही उपाययोजना करावी लागते. मेटफॉर्मिन सारखे इन्सुलिन स्टॅबिलायझर उपयोगात आणू शकता परंतु एकदा की तुमच्या डायबेटिसचे निदान झाले की तो बरा होऊ शकत नाही.

अफवा 6- आयुर्वेदिक औषधांनी मधुमेह बरा होऊ शकतो किंवा उलटविता येऊ शकतो

वास्तविकता – एकदम मधुमेहाचे निदान झाल्यानंतर तो पूर्णपणे बरा होऊ शकत नाही मग तुम्ही कोणतेही आयुर्वेदिक- होमिओपॅथिक- ऍलोपॅथिक औषधे वापरा. HbA1c म्हणजेच गळयकेट हिमोग्लोबिन ची टेस्ट, मधुमेह निदानासाठी च्या ब्लड टेस्ट मधली सर्वात विश्वासहकार्य म्हणून गणली जाते.

अफवा 7- मधुमेह हा रोग संसर्गजन्य आहे

वास्तविकता- मधुमेह हा रोग संसर्गजन्य नाही, हा रोग एका व्यक्ती मधून दुसऱ्या व्यक्तीकडे असा पसरत नाही.

अफवा 8 – इन्सुलिन इंजेक्शन खूप वेदनादायी असते.

वास्तविकता – इन्सुलिन इंजेक्शन वेदनादायी नसते.

खरे म्हणजे, इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते त्या इंजेक्शनच्या नीडल ची साईज खूपच लहान आणि बारीक असते आपण नॉर्मली रक्त तपासणीसाठी रक्त देतो त्या इंजेक्शन पेक्षाही खूप बारीक. आतातर बाजारामध्ये इन्सुलिन फ्लेक्स पेन ही उपलब्ध आहेत, यांच्याद्वारे पेशंट स्वतः इन्सुलिन चा डोस, कमीतकमी त्रासा मध्ये इंजेक्ट करून घेऊ शकतो.

अफवा 9 – टाइप 2 मधुमेह या प्रकारचा मधुमेह फक्त मोठ्या माणसांनाच होतो.

वास्तविकता – टाइप 2 मधुमेहाची लक्षणे लहान मुलांमध्येही दिसू शकतात.

आज-काल टाईप 2 मधुमेहाची लक्षणे लहान मुलांमध्येही सापडत आहेत. एका पाच वर्षाच्या लहान मुलाला टाईप दोन मधुमेहाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. बदलती जीवनशैली, चुकीच्या आहार पद्धती आणि लहान मुलांमधील वाढते वजनाचे प्रमाण ही टाइप 2 मधुमेहाची प्रमुख कारणे आहेत.

अफवा 10 – मधुमेहाचे पेशंट सक्रिय आरोग्यदायी जीवन जगू शकत नाहीत.

वास्तविकता – मधुमेहाच्या पेशंटस ना नियमित व्यायाम हा हवाच.

मधुमेहाची लक्षणे असणाऱ्या पेशंट नाव नियमित व्यायाम हा गरजेचा आहे त्यामध्ये वेगाने मध्यम वेगाने चालणे आणि सायकलिंग अशा ॲक्टिविटी चा समावेश होतो. याप्रकारच्या व्यायामामध्ये शरीरातील ग्लुकोज अपटेक वाढतो तसेच इन्सुलिनची कार्यक्षमताही वाढते. मधुमेह असणाऱ्या पेशंटने व्यायाम करण्याआधी कार्बोहाइड्रेट चे प्रमाण जास्त असणारे पदार्थ खाऊन मगच व्यायाम करावा जेणेकरून व्यायाम केल्यानंतर हायपोग्लायसेमिया म्हणजेच भुकेने चक्कर आल्यासारखे होत नाही..

अशाप्रकारे आपण मधुमेहा बद्दल असणाऱ्या अफवा- शंका-कुशंका यांना दूर करून त्याबद्दल योग्य मार्गदर्शन या लेखामध्ये केले आहे जर हा लेख तुम्हाला आवडला असेल,उपयोगी असेल वाटला तर कृपया करून हा आपल्या परिवारासोबत आणि मित्रांसोबत शेअर करावा धन्यवाद. 🙏🏻

सफरचंद दालचिनी सोया शेक – मधुमेह आहार मराठी

सफरचंद दालचिनी सोया शेक – 

आजची मधुमेह स्पेशल रेसिपी मध्ये आपण आज सफरचंद शेक बनवणार आहोत जो आरोग्याला चांगला आहे. यात आपण मधुमेह रुग्णांची रक्ताची पातळी नियंत्रणात राहील याचा विचार केला आहे.

ह्यात दालचिनी चा वापर केल्याने मधुमेह किंवा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. याशिवाय सालासकट सफरचंद घेतल्याने यात सोल्यूबल फायबर ची मात्रा वाढते त्याने एक जेल सारखे मिश्रण पोटात तयार होऊन कोलेस्टेरॉल व शुगर लेवल कंट्रोल करण्यास मदत होते.

ही माहिती मी एका व्यक्तीला पुरेल ह्या हिशेबाने लागणार्‍या सामग्री चे वर्णन करत आहे.

सफरचंद दालचिनी सोया शेक

 

साहित्य :

  • सफरचंदाचे तुकडे साली सकट न सोललेले ( अर्धा कप)
  • दालचीनी पाउडर (एक चिमुट)
  • थंडगार सोया मिल्क / लो फॅट मिल्क (एक कप)
  • साखरेचा पर्याय / स्टीवीया / पर्यायी (एक चमचा)

कृती किंवा तयार करण्याची पद्धत :

  • सगळे पदार्थ मिक्सर मध्ये एकत्र करा आणि मिश्रण बारीक आणि फेसाळ होई पर्यंत मिश्रित करा
  • तयार झालेला शेक ग्लास मध्ये ओता
  • त्वरित खाऊ घाला

तुम्हाला जर ही रेसीपी आवडली असल्यास तुमच्या मित्र परिवारांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद

 

मधुमेह किंवा डायबेटिस असलेल्या रुग्णांनी कोणत्या चाचण्या कराव्या?

मधुमेह ह्या आजारात मुख्यतः रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. रक्त हे सर्व शरीरभर रक्तवाहिन्यांतुन फिरते सोबत ही वाढलेली साखर देखील सर्व शरीरात आणि अवयवांना पोहोचवते. हे अवयवांना इजा करू लागले की आपल्याला त्रास जाणवू लागतो. त्यामुळे मुळात ह्या रक्तातील वाढलेल्या साखरेचे नियंत्रण करणे आवश्यक आहे.

आता जेव्हा आपण मधुमेह नियंत्रण हा शब्द संबोधतो त्यात तपासणी आणि उपचार हे दोन्ही येत, सोबत आहार पथ्य आणि व्यायाम सुद्धा आला.

आपण आज तपासणी ह्याबद्दल जाणून घेणार आहोत.

साधारणतः मूत्रपिंड किंवा किडनीचा उंबरठा हा 180mg/dl इतका आहे. त्यापुढे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास साखर लघवी मध्ये येण्यास सुरू होते. ह्या उंबरठ्यात मधुमेह रुग्णांमध्ये बराच चढउतार होतो आणि साखर लघवीत येऊ लागते.

मधुमेह तपासणी

 

मधुमेह किंवा डायबेटिस असलेल्या रुग्णांनी खालील चाचण्या कराव्यात :-

मधुमेह रुग्णांनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने खालील चाचण्या करून घ्याव्यात कारण काही वेळा खाली नमूद केलेल्या तपासण्यां व्यतिरिक्त आणखी काही तपासणीची गरज भासू शकते.

  • रिकामी पोटी रक्तातील साखरेची तपासणी (fasting blood sugar test) –

    ह्यात निदान 8-12 तासांचा उपवास असणे गरजेचे आहे. रिकाम्या पोटी रक्तातील साखरेची मात्रा ही साधारण पणे 100-110mg/dl च्या खाली ठेवणे आवश्यक आहे. मधुमेह नियंत्रणात ह्या चाचणीचे मूल्य फार आहे कारण जर दिवसाची सुरुवातच जास्त साखरेच्या पातळीने होत असेल तर जेवणानंतर तर अजून रक्तातील साखरेची पातळी वाढेल त्यामुळे सर्वप्रथम ती नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.

  • 2 तास जेवणानंतर रक्तातील साखरेची तपासणी ( 2 hr post prandial blood sugar test) –

    ह्या चाचणीत आपल्याला कल्पना येते की आपण जेवल्यावर साखरेचे प्रमाण किती वाढते. बहुतांश रुग्णांमध्ये ही चाचणी जास्त दाखवते कारण भारतीय लोकांच्या आहारात कार्बोहाइड्रेटचे प्रमाण जास्त असते. ही चाचणी करण्यापुर्वी तुमच्या मधुमेहाच्या नियमित गोळ्या घ्यायला विसरू नका.

  • ग्लायकोसायलेटेड हीमोग्लोबिन (HbA1c)-

    ही फार महत्वाची चाचणी आहे. ह्यात मागील तीन महिन्यांची रक्तातील साखरेची सरासरी कळते. ही चाचणी खाण्याच्या मात्रेने किंवा प्रकाराने बदलत नाही त्यामुळे ही जास्त विश्वासदायक आहे. चांगले मधुमेहाचे नियंत्रण म्हणजे ही चाचणी सात (HbA1c <7) च्या खाली ठेवणे. या व्यतिरिक्त अभ्यासातून असे लक्षात आले आहे की जो मधुमेह रुग्ण पहिले पाच वर्ष मधुमेहाच्या सुरवातीपासून ही चाचणी सात च्या खाली नियंत्रणात ठेवतो त्याला पाच वर्षानंतर जरी गोळ्या बंद केल्या तरी 95% कमी मधुमेहाचे दुष्परिणाम पुढील आयुष्यात शरीरावर होतात. ह्याला “लेगसी इफेक्ट” किंवा मेटबोलीक मेमरी असे म्हणतात.

  • सीरम क्रिऐटीनीन (serum creatinine) –

    ही देखील एक फार महत्वाची चाचणी आहे. साठीच्या पुढील रुग्णांनी ही निदान सहा महिन्यातून किंवा वर्षातून एकदा तरी करावी. ह्या चाचणीत आपल्याला किडनीची कार्यक्षमता ह्याचा अंदाजा येतो. बर्‍याच मधुमेह च्या गोळ्या ह्या किडनीतून शरीराबाहेर टाकल्या जातात त्यामुळे जर किडनी नीट काम करत नसेल तर त्यांचा शरीरात संच होऊन शुगर लेवल खाली जाण्याची (Hypoglycemia) शक्यता वाढते.

  • लिपिड प्रोफाईल (Lipid Profile) –

    ही चाचणी रक्तातील चर्बीची मात्रा दाखवते. ह्यात कोलेस्टेरॉल, ट्रायगलीसेराइड आणि एल डी एल (LDL) ह्या गोष्टी कमी ठेवणे आवश्यक आहे. ह्याचे प्रमाण रक्तात वाढल्यास हृदय विकाराचा झटका येण्याचा संभव वाढतो. एच डी एल (HDL) हे चांगले कोलेस्टेरॉल असून ते वाढलेले असावे.

  • ह्याव्यतिरिक्त मधुमेह चाचण्या –

    वर नमूद केलेल्या मुख्य चाचण्यां व्यतिरिक्त डॉक्टर तुम्हाला बाकी काही चाचण्या गरजे नुसार करावयास सांगतात. ह्यात लघवीची तपासणी (Urine routine), छातीची पट्टी (ECG), छातीची फिल्म (Xray) ईत्यादींचा समावेश होतो.

तुम्हाला ह्या विषयी काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स मध्ये विचारा. मी मुद्दाम फेसबुक कमेंट्स पण ठेवल्या आहेत सोप्या पडाव्या म्हणुन.

माहिती आवडल्यास आपल्या मित्र परिवारांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद

जय हिंद जय महाराष्ट्र

मधुमेह असलेल्या रुग्णांनी किडनी चे रक्षण कसे करावे?

मधुमेह असलेल्या रुग्णांनी किडनी चे रक्षण किंवा बचाव कसा करावा?

या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी आपल्याला आधी मधुमेह म्हणजे नेमक काय आहे हे कळणे गरजेचे आहे.

आपल्याला एवढ मात्र नक्की माहितीये की मधुमेहामध्ये रक्तात साखरेचे प्रमाण वाढलेले असते. आपण साधा विचार करायला हवा की रक्त तर डोक्याच्या केसापासुन पायाच्या नखा पर्यंत सर्वत्र जातेय आणि ते गरजेचे आहे नाहीतर सर्व अवयवांना ऑक्सिजन आणि जीवनावश्यक गोष्टी कशा पुरवता येणार पण रक्तासोबत वाढलेली साखर देखील सर्वत्र जातेय आणि ती नकळत मागे हळूहळू अवयवांना पोखरत आहे. जो पर्यंत ती एखादा अवयव डॅमेज करत नाही तो पर्यंत आपल्याला लक्षणे दिसत नाहीत आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. जर अगोदरच शुगर नियंत्रणात ठेवली असती तर हे झालच नसत हे आपण लक्षात घ्यायला हवे.

त्यामुळे किडनीच काय शरीरातील प्रत्येक अवयव वाढलेल्या रक्तातील साखरेने डॅमेज होऊ शकतो मग त्यात सर्व अवयव आले अगदी हृदय, नसा, डोळ्यांचा पडदा, रक्त वाहिन्या, हाड सर्वच.

आता मूळ मुद्द्यावर येतो. किडनी किंवा मूत्रपिंडाच रक्षण करण्यासाठी 5 गोष्टी फार आवश्यक आहेत.
त्या खालील प्रमाणे –

  • रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य नियंत्रणात ठेवणे.

    मधुमेह नियंत्रण योग्य असणे म्हणजे जी मधुमेहाची तीन महिन्याची चाचणी ग्लायकोसायलेटेड हीमोग्लोबिन (HbA1c) आहे तिचा रीपोर्ट (<7) सात च्या खाली राहिला पाहिजे आणि ते ही लो शुगर न होता. UKPDS स्टडी ने असे निदर्शनास आले आहे की जे नवे मधुमेह रुग्ण आहेत त्यांनी ही चाचणी जर आयुष्यातल्या पहिल्या पांच वर्षात चांगली ठेवली (HbA1c <7) तर त्यांना पुढील आयुष्यात गोळ्या बंद केल्या तरी 95% शरीरावर होणारे वाईट परिणाम कमी होतात. याला ‘लेगसी इफेक्ट‘ किंवा ‘मेटबोलीक मेमरी‘ असे म्हणतात.

  • उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणे.

    उच्च रक्तदाबामुळे मुख्यतः किडनी आणि डोळ्यांचा पडदा यांना सर्वात आधी आणि जास्त दुखापत होते. तसेच जगातील एकूणच हृदय विकारांनी होणारी मृत्यंची संख्या पाहिली असता निम्म्याहून जास्त लोकांना उच्च रक्तदाब असल्याचे निदर्शनास येते. किडनी किंवा मूत्रपिंड हे एक गाळणी सारख काम करत की ज्यात शरीरातील रक्त गाळले जाते आणि सर्व शरीरास उपयोगी गोष्टी राखून बाकीचे उत्सर्जक गोष्टी लाघवी मार्फत शरीराबाहेर टाकल्या जातात. या प्रक्रियेत उच्च रक्तदाबामुळे किडनी वर ताण येऊन काही चांगल्या शरीराला आवश्यक गोष्टी देखील मूत्रामार्गे शरीराबाहेर टाकल्या जातात. यात (albumin) नामक प्रथिने सर्वात आधी जाऊ लागतात. प्रथिने हे शरीराला बळकट करण्यासाठी महत्त्वचा घटक असल्याने शरीर कमजोर होऊ लागते.

  • वेदनाशामक (painkiller) औषधे घेणे टाळणे.

    बरीच वेदनाशामक औषधे प्रामुख्याने मूत्रपिंडावर असर करतात. यात NSAIDS ह्या श्रेणीतील औषधांचा समावेश होतो. ह्यात आपण जी रोजाना अंगदुखी, पायदुखी, कंबर दुखी ईत्यादी साठी जी वेदना शामक औषध घेतो ती येतात. त्यामुळे ती टाळणे गरजेचे आहे. जर आपण वेदना शामक औषधाचे मलम एखाद्या मोठ्या पृष्ठ भागावर (कंबर, पाठ वगैरे) लावत असाल तरी ते शरीरात शोषून घेतले जाते. त्यामुळे ते देखील टाळणे महत्त्वाचे आहे.

  • शरीरातील पाण्याची मात्रा कमी होऊ न देणे (avoid Dehydration).

    मधुमेह रुग्णांनी नेहमीच जास्त पाणी पिणे गरजेचे आहे कारण रक्तातील साखर वाढली असेल तर सारखे लघवीला जावे लागते आणि त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते. पण ज्या मधुमेह रुग्णांना हृदय विकार किंवा किडनी आजार (CKD) अगोदर पासून असेल तर त्यांनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने दिलेली पथ्य आणि नियम पाळणे आवश्यक आहेत अशा रुग्णांना बर्‍याचदा पाणी पिण्याची मर्यादा दिली असते ती पाळणे जरूरी आहे. मधुमेह पेशंट मध्ये जेव्हा कधी उलटी किंवा जुलाब होतात तेव्हा शरीरातील पाण्याची मात्रा (Dehydration) कमी होण्याची शक्यता असते तेव्हा ती भरून काढणे जरूरी आहे. अशावेळी जर जेवण कमी होत असेल तर मधुमेह गोळीचा डोस कमी करणे आवश्यक आहे कारण लो शुगर किंवा ‘हायपोग्लायसेमिया’ होण्याची शक्यता वाढते.

  • तंबाखू, धूम्रपान आणि मद्यपान बंद करणे.

    तंबाख आणि धूम्रपान केल्यामुळे रक्ताची viscosity वाढते म्हणजे थोडक्यात रक्त जाड होऊ लागते त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्याना अडथळा निर्माण होतो. अशाने ‘हार्ट अ‍ॅटॅक’ किंवा ‘स्ट्रोक अ‍ॅटॅक’ (लकवा येणे) यांचा धोका वाढतो. शिवाय रक्त जाड झाल्याने सर्व शरीरभर रक्तवाहिन्यांना इजा (Atherosclerosis) होऊ लागते. मग यात मूत्रपिंडाला पुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांचा देखील समावेश आहे. प्रमाणाबाहेर मद्यपान केल्याने यकृताला इजा होते शिवाय मधुमेहाच्या बर्‍याच गोळ्या ह्या लिवर मध्ये तुटतात त्यामुळे लिवर डॅमेजचा धोका उद्भवतो. त्यामुळे मधुमेह रुग्णांनी तंबाखू सेवन, धूम्रपान, मद्यपान पूर्णतः बंद केले पाहिजे.

मी दिलेली माहीती जर तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या मित्र परिवारांसोबत व्हाटसेप, फेसबुक वर शेअर करा. माझ्या फेसबुक पेज ला लाइक करा आणि अशाच वैज्ञानिक माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबसकाराइब करा.

धन्यवाद

जय हिंद जय महाराष्ट्र

डॉ निखिल प्रभु

मधुमेह स्पेशलिस्ट

दुध, दूधावरील साय मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी खाणे योग्य आहे काय?

दुध, दूधावरील साय मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी खाणे योग्य आहे काय?

मधुमेह असलेल्या रुग्णांनी दूध पिणे चांगले आहे कारण त्यात प्रोटीन आणि कॅल्शियम यांचे प्रमाण चांगले असते. परंतु कोणते दूध मधुमेह रुग्णांनी प्यावे यात बराच फरक आहे तो कसा हे मी थोडक्यात समजेल असे सांगतो.

आपण जेव्हा दूध पितो तेव्हा त्यात फॅट असते आता ह्या फॅट (fat) च्या मात्रेनुसार कोणते दूध मधुमेह असणार्‍या व्यक्तीला चांगले हे ठरते.

दुध गाई म्हशी चे

मधुमेह असणार्‍यांना कमी फॅट किंवा फॅट विरहित दूध पिणे चांगले.

दुधावरची साय म्हणजे संपूर्ण फॅट असल्यामुळे ती खाणे मधुमेह असणार्‍यांनी टाळावं. या शिवाय दुधापासून बनवलेले पदार्थ जसे की दही, ताक हे मधुमेह असणार्‍यांना घेणे चांगले आहे परंतु तूप, लोणी, बटर, चीज, घी ईत्यादी खाणे टाळावं.

आता बाजारात मिळणार्‍या दुधामध्ये बरेच प्रकार आहेत. ते म्हणजे टोन दूध, डबल टोन दूध आणि स्कीम दूध.

हे सांगण्याआधी प्रथम लक्षात घ्या की म्हशीच्या दुधात फॅट हे जवळपास 6% असते तर गायीच्या दुधात ते जवळपास 3% असते त्यामूळे गायीचे दुध हे मधुमेह असणार्‍यांना पिणे चांगले म्हशीच्या दुधाहून.

सर्वात कमी फॅट असणारे दूध म्हणजे स्कीम दूध हे मधुमेह किंवा हृदय विकार असणार्‍यांना पिणे सर्वात चांगले. स्कीम दुधात अगदी नगण्य म्हणजे 0.5% हून कमी फॅट असते.

डबल टोन दुधात फॅट ची मात्रा जवळपास 1.5% तर टोन दुधात ही मात्रा जवळपास गाई च्या दुधा इतकी म्हणजे 3% एवढी असते.

त्यामुळे जर तुम्हाला मधुमेह असल्यास तुम्ही गाईच किंवा म्हशीचे दूध पीत असाल तर दूध उकळून साय बाजूला काढून ठेवा.

स्कीम दुधाचे काही फायदे खाली नमूद करतो :-

  • वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
  • लट्ठपणाशी संबंधीत असलेले प्रॉब्लेम आणि छातीत जळजळ, ऐसीडीटी नियंत्रण
  • आतड्याच्या कर्करोगाची रिस्क कमी होते
  • मधुमेह आणि हृदय विकाराचा धोका कमी होण्यास मदत
  • मधुमेह असणार्‍यांना दुधाचा सर्वात चांगला पर्याय
  • हाडे ठिसूळ होणे (osteoporosis) यात जास्त प्रथिने, कॅल्शियम आणि कमी फॅट असणे उपयुक्त.

तुम्हाला जर मी दिलेली माहिती उपयोगी वाटल्यास आमच्या फेसबुक पेज ला लाइक करा आणि हे उत्तर नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा

धन्यवाद

जय हिंद जय महाराष्ट्र

डॉ निखिल प्रभु

मधुमेह स्पेशलिस्ट

मुंबई